शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४
*दुर्ग निकष पूर्ण करणारा: वेताळवाडी किल्ला*
गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४
वेताळगड/वसईचा किल्ला। एक भ्रंमंती
वेताळगडावरील उत्तरेकडील भाग
गडावरील घसरंडीची वाट
बारादरीची कमान
गडावरील तलाव
हळदाघाटातून दिसणारा वेताळगड
हेमाडपंथी मंदीर
आन्वा येथील हेमाडपंथी मंदीर
वेताळगडावरील गुहा
बांगडीतोंफ
बालेकिल्लावरील भाग
जमीनीमधील राजणं
गडावरून पश्मिम भागात दिसणारा जंजाळा किल्ला व वेताळवाडी धरण
गडावरील इमारती
गडावरील तलाव
वेताळवाडी गाव
गडावरील घुमट असलेली छोटी इमारत
निमुळती पाऊलवाट
गडावरील दरवाजावरील शिल्प
आमची इतिहासप्रेमी टिम
वेताळवाडी गड /वसईचा किल्ला /हळदा
सुटीचा दिवस आला म्हणून जमेल तशी सवड काढून दुर्ग अथवा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळाना भेट देत भ्रमंती करणारी आमची टीम सदैंव तत्पर असते .आजच्या काळात व्यस्त जीवनशैलीत वेळ काढणे ही फार मोठी गोष्ट आहे त्यातल्या त्यात आम्ही राऊत सर,किशोर पंवार सर ,सुशिल पनाड सर,आणि इतिहासाचे अभ्यासक राजेश साळवे सर सोडले तर कामाचा मोठा व्याप असूनही भ्रमतीचे नियोजनाची आखणी सुरेश देवकर सरांचीच असते .आमचे काही मित्र ,मार्गदर्शक वेळेअभावी आमच्या सोबत वेळेअभावी येऊ शकले नसले तरी ते पूर्णवेळ आमच्या भ्रंमंतीचा आढावा घेत असतात बरींच आल्यांनंतर चर्चेसाठी तत्पर असतात येवढी ही माणसे आपल्या वासश्या विषयी आपुलकी जपतात हे पाहतांना असे मार्गदर्शक व सहकारी असल्याचा अभिमान वाटतो .
खर तर आम्ही निघालो होतो अंतुर या किल्ल्यासाठी भराडी ,करजखेड या मार्गे पण भोकरदन तालुक्यातील हेमाडपंथी मंदीराला भेट दिली .प्राचीन नक्षीकाम ,असलेले असे सुंदर मंदीर आजही आहे आता त्याला लोखंडी खांबाने आधार देत त्याचे काम सुरू आहे .काहीस्वरूपात दुरूस्तीचे कामही सुरु आहे मंदिराच्या आतील कोरीव काम शेकडो वर्षानंतरही जसेच्या तसे आहे त्या दगडावर मारलेती पॉलीशही स्पष्ट जाणवते ,पुढील गड फिरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तेथून आम्ही निघालो व स्थानिकांच्या सूचनेनुसार ह्ळदा घाटातील किल्ला जवळ व पाहण्यासारखा आहे असे कळाले म्हणून किल्ला महत्वाचा या आशेने हळदा गावाकडे निघालो ,गोळेगाव -उंडणगावमार्गे -हळदा या गावात पाउण तासात पोहचलो व हळदा घाटात उतरतांना वेताळगडाचे /वसईचा किल्ला दर्शन् झाले बुलढाणा शहरापासून दोन अडीच तासाच्या अंतरावर असलेला वेताळगड आजपर्यन्त पाहीला नव्हता .आपण जवळ येवढा सुंदर किल्ला आहे हे पाहूण खूप आनंद झाला .घाटातून जात असतांना गडाची मजबुत तटबंदी व बुरुज लगेच दिसतात पण किल्ल्याचे प्रवेशद्वारमात्र समजत नाही .
गडाच्या बाजूला घाटातूनच वर जाण्यास निमुळती पाऊलवाट आहे ती आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते .घाटात बाजूला गाडी लावून आम्ही त्या वाटेने मुख्य प्रवेश द्वारा पर्यन्त पोहचलो .आजही मुख्यप्रवेशद्वार मजबूत स्थितीत आहे या हे द्वार निमुळते असून जवळ येईपर्यन्तं दरवाजा दिसत नाही दरवाज्याच्या वर दोन प्रचंड सुस्थितीमधील बुरुज आहे शत्रू आत येणे शक्यच नाही तोफा,दगड,तेल,अंगार ओतण्यासाठी चाऱ्या आहेत .मुख्य द्वाराच्या बाजूला प्राण्याचे चित्र असलेले शिल्प आहे याच पद्धतीचे शिल्प पुढे जंजाळा /वैशागडावर सुद्धा आहे त्याची चर्चा पुढच्या लेखात स्वतंत्र करू .
दरवाज्यातून येताना भव्य खोली दिसते दगडी बांधकामात कमानीमधून केलेले बांधकाम आहे वर आल्यावर एका निमूळत्या वाटेतून बुरूजावरील एका खोलीत उतरणारा रस्ता आहे त्या छोटयाश्या खोलीमधून गडात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर मुख्य द्वारापासून हळदाघाटात व जंजाळा गडापर्यन्तच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते .पुढे गड चढावा लागणार म्हणून त्या थंडगार खोलीत आम्ही जेवन केले व पुढे निघालो ,वर जातांना एक मोठी गुहा आहे त्यात निघालेले दगड या गडासाठी वापरले असावेत त्यात पाणी आहे व प्रचंड बटवाघुळीचा आवाज आत जाणे योग्य नाही म्हणून पुरेसे पाणी घेऊन निघालो. येवढया मोठया गडावर वरून येतांना दोनच औरंगाबाद येथून आलेले दुर्गवेडे भेटले व वर गड सुंदर व खूप मोठा आहे असे सांगीतले व पाणी सोबत ठेवा सांगून गडउतार झाले
गडाचे दुरूस्तीचे काम बऱ्यापैकी चालू असल्याचे दिसले ढासाळलेली तटबंदी व बुरुज बांधणी(दुरूस्ती) काम सुरु आहे .मुख्य दरवाज्याच्या वर एक तोफ आहे बांगडी प्रकारातील ही लोखंडी तोफ बुरुजावर् आता व्यवस्थितपणे उभी केली आहे .थोडा वळसा घेत काही अंतर चढाई केल्यावर आपण गडावर पोहचतो' ,गडाचे क्षेत्र मोठे आहे आता वर सिताफळांची दाट झाडी आहे. थोडे चालत गेल्यावर त्या झाडीमध्ये जिर्ण अवस्थेमधील इमारती आहे ,जमीनीमध्ये दगडापासून तयार केलेला भला मोठा राजंण आहे तेलतुपाचा राजंण त्याला म्हटलं जाते ,त्याच्या बाजूला कमाणीचे छत असलेली इमारत आहे वर प्रकाश येण्यासाठीचे झरोके आहेत ही धान्यकोठी असावा असे वाटते
त्याच इमारतीसमोर काहीवर्षापूर्वीच छत कोसळलली इमारत दाट झाडीत आहे हा बालेकिल्ला असावा .त्या दाट झाडीत खूप मो०या इमारतीचा पाया आहे दगड पडलेल आहे,प्राचीन विटा,कौलारु /भांडी तुकडे यांचे अवशेष दिसतात. थोड पुढ गेले की प्राचीन तलाव आहे मार्च मध्ये सुद्धा तलाव ६०% भरलेला दिसला गडाला याच तलावाचे पाणी वर्षभर पुरत असावे .त्या तलावासमोरच एक प्राचीन इमारत आहे छत नसलेली पण आजही मजबूत स्थितीमध्ये आहे कोरिव काम केलेले पायाचे दगड दिसतात .
गडाच्या उत्तरेकडे थोड चालत गेले की एक जिर्ण कमानीची बारादरी इमारत आहे त्या कमानीमधून खाली वेताळवाडी गाव दिसते या ठीकाणाहून संपूर्ण खान्देश भागात लक्ष ठेवता येते .त्या इमारतीच्या खाली वेताळवाडीकडे निघणारा गडाचा जंजाळा किल्याकडे जाणारा दरवाजा आहे. संपूर्ण गडाला मजबूत तटबंदी व बुरूज आहेत या तटबंदीवरून संपूर्ण गडाला वेढा मारता येतो ,गडाला म्हणजे बालेकिल्यालाही तटबंदी असावी असे अवशेषावरुन वाटते. गडाच्या दक्षिण बाजूस एक दुहेरी तटबंदीमधील बुरुज दिसतो त्याच्याच बाजूला घुमट असलेती एक छोटी समाधीसारखी नक्षीकाम केलेली इमारत आहे यात दोन्ही बाजूला एक माणूस उभा राहील येवढयाच झरोका असलेल्या खोल्या आहेत अतिक्षय दाट झाडी व पडझड ह्यामुळे बऱ्याच गोष्टी गडावर दबून पडलेल्या आहेत.
सैन्याची मोठी रसद व दारुगोळा मुबलक असल्यावर हा किल्ला कुणीही जिंकू शकणार नाही अशी रचना आहे उत्तरेकडील हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधला असावा,किल्याच्या पश्चिमेस जंजाळा /वैशागड दिसतो त्याच वाटेत असलेले वेताळवाडीचे धरण दिसते . या दोन्ही किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी या भागातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड नांद्रा, तालतम, भांगसीमाता, सुतोंडा , राहिलगड, मस्तगड असे तब्बल आठ दुर्लक्षित गड-किल्ले आहेत ह्यांना भेट दिल्यानंतर सविस्तरपणे मांडू या
तेथून आम्ही परत फिरलो एक परिपूर्ण असा किल्ला पाहण्याचे आम्हा सर्वांना समाधान झाले दुपारचे दिड वाजले होते व पुढे आम्ही रूद्रेश्वर लेणीकडे वेताळवाडी मार्गे निघालो ..........
( हा किल्ला बुलढाणा,जालना,औरंगाबाद,सिल्लोड,जळगाव या शहरापासून एका दिवसात होईल असा आहे या पारिसरात रूद्रेश्वर लेणी ,घटत्कोच लेणी व जंजाळा किल्ला पर्यटनासाठी आहे )
क्रमशः.....................
खर तर आम्ही निघालो होतो अंतुर या किल्ल्यासाठी भराडी ,करजखेड या मार्गे पण भोकरदन तालुक्यातील हेमाडपंथी मंदीराला भेट दिली .प्राचीन नक्षीकाम ,असलेले असे सुंदर मंदीर आजही आहे आता त्याला लोखंडी खांबाने आधार देत त्याचे काम सुरू आहे .काहीस्वरूपात दुरूस्तीचे कामही सुरु आहे मंदिराच्या आतील कोरीव काम शेकडो वर्षानंतरही जसेच्या तसे आहे त्या दगडावर मारलेती पॉलीशही स्पष्ट जाणवते ,पुढील गड फिरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून तेथून आम्ही निघालो व स्थानिकांच्या सूचनेनुसार ह्ळदा घाटातील किल्ला जवळ व पाहण्यासारखा आहे असे कळाले म्हणून किल्ला महत्वाचा या आशेने हळदा गावाकडे निघालो ,गोळेगाव -उंडणगावमार्गे -हळदा या गावात पाउण तासात पोहचलो व हळदा घाटात उतरतांना वेताळगडाचे /वसईचा किल्ला दर्शन् झाले बुलढाणा शहरापासून दोन अडीच तासाच्या अंतरावर असलेला वेताळगड आजपर्यन्त पाहीला नव्हता .आपण जवळ येवढा सुंदर किल्ला आहे हे पाहूण खूप आनंद झाला .घाटातून जात असतांना गडाची मजबुत तटबंदी व बुरुज लगेच दिसतात पण किल्ल्याचे प्रवेशद्वारमात्र समजत नाही .
गडाच्या बाजूला घाटातूनच वर जाण्यास निमुळती पाऊलवाट आहे ती आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन जाते .घाटात बाजूला गाडी लावून आम्ही त्या वाटेने मुख्य प्रवेश द्वारा पर्यन्त पोहचलो .आजही मुख्यप्रवेशद्वार मजबूत स्थितीत आहे या हे द्वार निमुळते असून जवळ येईपर्यन्तं दरवाजा दिसत नाही दरवाज्याच्या वर दोन प्रचंड सुस्थितीमधील बुरुज आहे शत्रू आत येणे शक्यच नाही तोफा,दगड,तेल,अंगार ओतण्यासाठी चाऱ्या आहेत .मुख्य द्वाराच्या बाजूला प्राण्याचे चित्र असलेले शिल्प आहे याच पद्धतीचे शिल्प पुढे जंजाळा /वैशागडावर सुद्धा आहे त्याची चर्चा पुढच्या लेखात स्वतंत्र करू .
दरवाज्यातून येताना भव्य खोली दिसते दगडी बांधकामात कमानीमधून केलेले बांधकाम आहे वर आल्यावर एका निमूळत्या वाटेतून बुरूजावरील एका खोलीत उतरणारा रस्ता आहे त्या छोटयाश्या खोलीमधून गडात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीवर मुख्य द्वारापासून हळदाघाटात व जंजाळा गडापर्यन्तच्या हालचालीवर लक्ष ठेवता येते .पुढे गड चढावा लागणार म्हणून त्या थंडगार खोलीत आम्ही जेवन केले व पुढे निघालो ,वर जातांना एक मोठी गुहा आहे त्यात निघालेले दगड या गडासाठी वापरले असावेत त्यात पाणी आहे व प्रचंड बटवाघुळीचा आवाज आत जाणे योग्य नाही म्हणून पुरेसे पाणी घेऊन निघालो. येवढया मोठया गडावर वरून येतांना दोनच औरंगाबाद येथून आलेले दुर्गवेडे भेटले व वर गड सुंदर व खूप मोठा आहे असे सांगीतले व पाणी सोबत ठेवा सांगून गडउतार झाले
गडाचे दुरूस्तीचे काम बऱ्यापैकी चालू असल्याचे दिसले ढासाळलेली तटबंदी व बुरुज बांधणी(दुरूस्ती) काम सुरु आहे .मुख्य दरवाज्याच्या वर एक तोफ आहे बांगडी प्रकारातील ही लोखंडी तोफ बुरुजावर् आता व्यवस्थितपणे उभी केली आहे .थोडा वळसा घेत काही अंतर चढाई केल्यावर आपण गडावर पोहचतो' ,गडाचे क्षेत्र मोठे आहे आता वर सिताफळांची दाट झाडी आहे. थोडे चालत गेल्यावर त्या झाडीमध्ये जिर्ण अवस्थेमधील इमारती आहे ,जमीनीमध्ये दगडापासून तयार केलेला भला मोठा राजंण आहे तेलतुपाचा राजंण त्याला म्हटलं जाते ,त्याच्या बाजूला कमाणीचे छत असलेली इमारत आहे वर प्रकाश येण्यासाठीचे झरोके आहेत ही धान्यकोठी असावा असे वाटते
त्याच इमारतीसमोर काहीवर्षापूर्वीच छत कोसळलली इमारत दाट झाडीत आहे हा बालेकिल्ला असावा .त्या दाट झाडीत खूप मो०या इमारतीचा पाया आहे दगड पडलेल आहे,प्राचीन विटा,कौलारु /भांडी तुकडे यांचे अवशेष दिसतात. थोड पुढ गेले की प्राचीन तलाव आहे मार्च मध्ये सुद्धा तलाव ६०% भरलेला दिसला गडाला याच तलावाचे पाणी वर्षभर पुरत असावे .त्या तलावासमोरच एक प्राचीन इमारत आहे छत नसलेली पण आजही मजबूत स्थितीमध्ये आहे कोरिव काम केलेले पायाचे दगड दिसतात .
गडाच्या उत्तरेकडे थोड चालत गेले की एक जिर्ण कमानीची बारादरी इमारत आहे त्या कमानीमधून खाली वेताळवाडी गाव दिसते या ठीकाणाहून संपूर्ण खान्देश भागात लक्ष ठेवता येते .त्या इमारतीच्या खाली वेताळवाडीकडे निघणारा गडाचा जंजाळा किल्याकडे जाणारा दरवाजा आहे. संपूर्ण गडाला मजबूत तटबंदी व बुरूज आहेत या तटबंदीवरून संपूर्ण गडाला वेढा मारता येतो ,गडाला म्हणजे बालेकिल्यालाही तटबंदी असावी असे अवशेषावरुन वाटते. गडाच्या दक्षिण बाजूस एक दुहेरी तटबंदीमधील बुरुज दिसतो त्याच्याच बाजूला घुमट असलेती एक छोटी समाधीसारखी नक्षीकाम केलेली इमारत आहे यात दोन्ही बाजूला एक माणूस उभा राहील येवढयाच झरोका असलेल्या खोल्या आहेत अतिक्षय दाट झाडी व पडझड ह्यामुळे बऱ्याच गोष्टी गडावर दबून पडलेल्या आहेत.
सैन्याची मोठी रसद व दारुगोळा मुबलक असल्यावर हा किल्ला कुणीही जिंकू शकणार नाही अशी रचना आहे उत्तरेकडील हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधला असावा,किल्याच्या पश्चिमेस जंजाळा /वैशागड दिसतो त्याच वाटेत असलेले वेताळवाडीचे धरण दिसते . या दोन्ही किल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी या भागातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात अंतूर, लहुगड नांद्रा, तालतम, भांगसीमाता, सुतोंडा , राहिलगड, मस्तगड असे तब्बल आठ दुर्लक्षित गड-किल्ले आहेत ह्यांना भेट दिल्यानंतर सविस्तरपणे मांडू या
रविवार, १० नोव्हेंबर, २०२४
*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*
सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४
त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*
मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )
सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४
चावंड किल्ला
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
महा वारसा
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४
मराठा सेवा संघ
मराठा सेवा संघ : एक विचार
१ सप्टेबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना युग पुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली . विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार होता . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघ हा आकार घेत होता . याच उद्देशांने शासकिय ,निमशासकिय ' कार्पोरेट अधिकारी , कर्मचारी तथा इतर खाजगी क्षेत्रात काम करणारे पगारदार लोकांचे संघटन, "मी या समाजाचा घटक आहे आणि त्याचे मला काही देणे लागते " या कृतज्ञतेच्या भावनेने समाजभिमुख लोकांचे संघटन आदरनिय साहेबांच्या प्रेरणेने कामास लागले व आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत . मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते. स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते . मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मराठा सेवा संघाने राजमाता जिजाऊ यांचे चरित्र, विचार व कार्य हा आदर्श ठेवून मातृशक्तीच्या प्रेरणेने मातृतीर्थ सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर आणण्याचे महान कार्य केले .इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मराठा सेवा संघाने या मातीतल्या माणसाला दिली . राजमाता जिजाऊंचा दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले अनेक दंतकथा रचल्या गेल्या .ज्यांना कुठलाही तर्कशुध्द आधार नाही समकालिन विश्वासअर्ह साधन साहित्याचा पुरावाही नाही .अर्कज्ञ शहाजीराजे भोसले , राजे लखुजीराव जाधव , छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे यांचा अत्यंत पराक्रमी इतिहास मराठा सेवा संघाच्या तालमित घडलेल्या अनेक इतिहासकारांनी तथा अभ्यासकांनी समोर आणण्याचे मोठे ऐतिहासिक काम केले आणि आजही ते होत आहे . महात्मा बसवेश्वरांनी जातीअंताची चळवळ सुरु केली त्यानंतर मानवी मनांची साखळी जोडणारे समतेचे सेतू संत श्रीचक्रधर स्वामी ठरले त्यानंतर संतशिरोमणी संत नामदेवांनी उभारलेली प्रबोधनाची भगवी पताका पुढच्या काळात वारकरी संत परंपरेने पुढे चालवत आणली . अनेक भाषिक अन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित समाजाला उभारणी देण्याचं काम केले . सकलशस्त्रशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांनी लिहलेल्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातील एक महत्वाचा श्लोक इथे सांगावासा वाटतो ,
प्रियः प्रजानां दातैव न पुनर्द्रविणेश्वर: ।
आगच्छन्काड्र.क्ष्यते लोकैर्वारिदो न वारिधिः।
छत्रपती संभाजीराजे आपल्या या महान ग्रंथातील प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.
देत राहणाऱ्यांची प्रचंड मोठी श्रृंखला आपल्या पवित्र भूमिची आहे मग ती धन संपत्ती असो की ज्ञान ! संतांनी मेघाप्रमाणे देण्याचेच काम केले . जगतगुरू तुकाराम महाराजांनी तर आपल्या जवळील धना सोबतच आयुष्य भर शब्द रुपी धन वाटण्याचे काम निर्भिडपणे केले .याच महान संत व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी म्हणून मराठा सेवा संघ आपले काम करत आहे .आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय . महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपली वैचारीक बैठक मजबूत असणारा हाडामासाचा सच्चा मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता हा लाखा येवढा ठरतो . तो कधीही आपल्या विचारापासून दूर जात नाही . कधीही आपली चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन तो सोडत नाही .आज मी सेवा संघाच्या विचाराचा आहे असे बोलतांना अनेकदा ऐकतो . त्याचे कारण हेच आहे . आज आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून जगभर आपले विचारांचे जाळे विणले आहे . कृषी, उदयोग , कला , साहित्य, क्रिडा , संशोधन , विज्ञान आदि विविध क्षेत्रात काम करत समाजातीत अगदी शेवटच्या घटका पर्यन्त संधी निर्माण करून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे .
कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश मराठा सेवा संघाने पुढे चालवला .
"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा. "
मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला. मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जागतीक स्तरावरील जिजाऊ जन्मोंत्सवाच्या निमित्ताने लाखो जिजाऊ प्रेमी एकत्र येवून जिजाऊ चरणी नतमस्तक होतात . विचारांची देवाव घेवाण होऊन करोडो रुपयांची केवळ पुस्तकाची उलाढाल होते .शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. या देशातील ऐतखाऊ व्यवस्था नष्ट करून उत्पादक समाज व्यवस्थेला समाजात त्याचे स्थान निर्माण करून देणे . तथा तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक देण्याचे काम सेवा संघ करत आहे . कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता तरुणांनी बुट पॉलिश ते तेल मालिश पर्यन्तचा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे . विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारे सततचे परिवर्तन तरुणांनी लक्षात घेऊन त्यामधे संधी शोधली पाहीजे . शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकतं याच भान ठेवत शेतकर्यांनी आधुनिक तत्रज्ञानाची कास धरली पाहीजे . तरुणांनी आपले स्वहीत तथा राष्ट्रहीत जपत आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेतला पाहीजे . असे कुटुंब अन आपोआपच मग समाज घडविण्याचे काम मराठा
सेवा संघ करत आहे .
हे एक विचारांचे संघटन असल्याने खेड्यापाड्यातही आज हा विचार घराघरात पोहोचलेला आहे.
आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघ काय आहे, तर मराठा सेवा संघ
एक दिशा.......एक परिवर्तन.......एक विचार.......एक मार्ग.......मन -मस्तक अन मनगट मजबूतीचं .........!!!!
नतमस्तक व्हायला शिकलो.....विचार आणि आदर्शा पुढे......!!! लढायला शिकलो......सत्यासाठी......!!
वाचायला शिकलो....चिकित्सेसाठी.......!!
बोलायला शिकलो ....न्यायासाठी.......!!
🌿🌿🌿🌿🌿
॥ तुमच आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय॥
🌿🌿🌿🌿🌿
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌿🌿🌿🌿
संजय खांडवे
बुलढाणा जिल्हाध्यक्ष इतिहास कक्ष
9011971122
बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४
महाभूमि
*मायभूमीशी नाळ जुळलेला : दै महाभूमी*
शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते शब्द ही शस्त्र आणि अस्रही असतात . या शब्दाचे महात्म्य याच भूमीत म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी जनसामान्याच्या मुखा -मुखात रूढ केले . कोणे एकेकाळी ज्या शब्दज्ञानाने आमचा नाश केला होता त्याच शब्दांना शस्त्र करण्याचा मार्ग आम्हाला तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळाला . हीच या महाराष्ट्र भूमीची शिकवण आहे . या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या पवित्र माती प्रति निश्चितच कृतज्ञ असतों . हीच शिकवण आहे . महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी राहिली आहे याच संत परंपरेतून वारकरी संप्रदाय उदयास आला या मातीत जन्मलेल्या अगदी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नती आणि उद्धारासाठी त्याच्या कल्याणार्थ वारकरी विचारधारेने काम केले. संत नामदेव - संत ज्ञानेश्वर -संत एकनाथ - संत सावता - संत गोरोबा काका - संत चोखोबा अन - संत तुकोबा पर्यंत हातात टाळ मृदुंग घेऊन गावागावात अन घराघरात अभंग - भारुडे अनओवीच्या रूपाने मुखदगत होऊन ही शब्दरूपी शस्त्रे पोहोचत गेली अन समाजप्रबोधन होऊन जनसामान्यांना जगण्याचा सोपा मार्ग मिळाला . परमेश्वरापर्यंत सहज पोहोचणारा भक्तिमार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी दूर होऊन सामान्य माणूस अगदी सहजपणे कुठलीही आडकाठी न घेता भक्ती मार्गावर मार्गस्थ झाला .
आजच्या काळात शब्द हे प्रमाण मानले जाते. विश्वासअर्हता आणि लोकमान्यता मिळाली की शब्दाची किंमत अधिकच वाढते आणि या शब्दाची नाळ जर मायभूमीशी जुळलेली असेल तर मग यासाठी शब्दच नाही ! असं म्हणावे लागेल .याच लोकप्रबोधनाचा आणि लोककल्याणाचा प्रामाणिक वसा घेऊन दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा संस्थापक सुरेश देवकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणजे त्यांचे शब्द हे प्रखरतेने प्रत्येक जबाबदार व्यवस्थेकडे पोहोचावेत, त्यांच्या व्यथा आणि संघर्ष सर्वांना कळावा याचबरोबर या मातीत जन्मलेल्या लेखक , कवी, समिक्षक तथा संशोधक यांचे शब्द विचार घराघरात पोहोचावे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुखातील शब्द व्यवस्थेने जाणावे, कर्तबगार संघर्ष कन्या आणि महिला तथा यशस्वी उद्योजकांची प्रेरणा जिजाऊंच्या महा भूमीत प्रत्येक महिलेने घ्यावी हा मानस त्यांनी ठेवला . शिक्षण अन अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी या आपल्या मराठी मुखपत्रातून या मातीच्या कल्याणार्थ झटणारी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील अन कृतिशील होऊन दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात दैनिक महाभूमीचा जन्म झाला .
संस्थापक तथा मुख्य संपादक यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे . प्रसंगी काळ्या पाषाणातूनही पाणी काढण्याचे सामर्थ्य त्यांनी याच महाभूमीत जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घेतले आहे . प्रचंड वाचन आणि त्याचे विश्लेषण करून यथायोग्य आचरण हा त्यांचा स्वभाव गुण . माता-मातृभूमी आणि आपली माणसे ही त्यांची बलस्थाने .या तीन मकारांसाठी ते सदैव तत्पर असतात या शुद्ध विचारातून त्यांचा उत्तम व्यवहार आपसूक लोकांपुढे येतो म्हणून आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तथा जालना - छत्रपती संभाजीनगर - जळगाव - मुंबई आदी जिल्ह्यातून सहकार क्षेत्रात एक विश्वास निर्माण केला आहे .
दैनिक महाभूमीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षातच मराठवाडा विदर्भ या दोन प्रांतांना जोडणारे विश्वास अर्ह मराठी मुखपत्राच्या रूपाने ते समोर आले आहे आजही ग्रामीण मराठवाडा अन वऱ्हाड ही त्यांची विशेष असलेली एकूण १२ पानापैकी सकाळीच त्या त्या प्रांतातील वाचकांसाठी एक पर्वनीच ठरत आहे .खेड्यापाड्यात अन वाडी वस्तीवरही महाभूमी शब्द रूपाने पोहोचला आहे ही मातृभूमीशी असलेली नाळ अतूट आहे .निर्मळ - निकोप अन निपक्ष असलेल्या महाभूमीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन हे शब्दरूपी शस्त्र अंन धन जनमान्यात वाटण्याचे पवित्र कार्य अखंड अविरत चालू राहो हीच शुभेच्छा .
संजय खांडवे
9011971122
बुलढाणा
स्वांतत्र्य एक जबाबदारी
स्वांतत्र्य एक जबाबदारी*
इसवी सन पूर्व 300 च्या काळात चक्रवर्ती सम्राट अशोक एक प्रियदर्शी राजा होऊन गेला . त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या काळात संपूर्ण भारतासह आजूबाजूचा बहुतांश प्रांत काबीज केला होता .भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा तो हाच काळ होता . आज आपली भारतीय राजमुद्रा आपण पाहतो की प्रत्यक्षात चार सिंहमुख असलेल्या अशोक चक्राच्या खाली "सत्यमेव जयते " हे ब्रीद आहे .यावरून सदैव सत्याचा विजय असणारे , सत्याच्या बाजूने असलेले अत्यंत प्रगत असे लोककल्याणकारी साम्राज्याचे मौर्य सम्राट अशोक हे लोकशासक होते हे सिद्ध होते .सातवाहन, वाकाटक हे इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत भारतामध्ये प्रगत शासकापैकी एक .पुढील काळात तिसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये अत्यंत समृद्ध असा गुप्त काळ आला या काळात साहित्य ,कला ,संस्कृती तथा व्यापार याला सम्राट अशोकाच्या काळा प्रमाणेच अधिक वाव मिळाला.इतिहासाच्या संदर्भावरून सम्राट अशोकांच्या काळात लोककल्याणार्थ अनेक कामे झाली असे दिसून येते .परंतु यानंतर मात्र साधारणपणे 9 व्या 10 व्या शतकापासून भारत खंडास परदेशी आक्रमणाची संकटे सतत भेडसावू लागली .या काळात अनेक आक्रमणे उत्तरेकडून भारतावर होऊ लागली पुढील काळात मोघलांनी शेकडो वर्ष आपल्या या भारतभूमीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले .17 व्या शतकात मात्र राजे लखुजी जाधव , शहाजीराजे भोसले , राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी राजे यांच्या रयतवत्सल भावनेने त्यांच्या संघर्ष व त्यागातून एतद्देशियांचे स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उभे राहिले . स्वराज्य हे या मातीत जन्मलेल्या तथा मातीसाठी स्वाभिमान आपल्या उरात बाळगणाऱ्या मावळ्यांचे राज्य होते .त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना स्वातंत्र्याची ओढ लावून दिली .अठरापगड जाती-धर्माचे वज्रमूठ बांधून स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष याची जाणीव त्यांना झाली . परस्परांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभे होत गेले .रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य ही निरपेक्ष भावना प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण झाली. स्वराज्यासाठी लढणारा मावळा ही ओळख मिळाली हीच स्वातंत्र्य , समता व बंधूतेची नांदी होती .यातूनच स्वराज्य न्याय देणारे ठरले पुढे शिवरायांच्या आणि छत्रपती शंभुराजांच्या निर्वाणानंतर दिडशे वर्षापर्यंत मावळे स्वराज्यासाठी मोठ्या स्वाभिमानाने स्वातंत्र्यासाठी लढत राहिले ते कधीही झुकले नाही हीच प्रेरणा इंग्रजांशी लढताना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महावीरांना मिळाली .
एका चर्चेमध्ये तथागत गौतम बुद्ध अंम्ब ट्ठाला म्हणतात "अंम्बट्ठा छोटीशी चिमणी देखील स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिव चिव करीत असते . " यामधून स्वातंत्र्याचा अर्थ प्रतीत होतो . स्वातंत्र्याची व्याप्ती कळते .डॉ . बाबासाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अखंड मानव जातीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली . "आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण स्वातंत्र्याचे रक्षण करू असा आपण निश्चय केला पाहिजे " असे त्यांनी आपल्या 25 नोव्हेंबर 1949 च्या संविधान सभेतील भाषणात सांगितले होते . स्वातंत्र्य ही खूप मोठी आनंददायी बाब आहे त्यासाठी सामाजिक लोकशाही आपण जपली पाहिजे . आपल्या हक्क , अधिकारासाठी तथा आपले सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गाने गेले पाहिजे हा संदेश त्यांनी संविधानातून दिला . शिवरायांनी जसे "रयतेचे राज्य " म्हटले तसेच भारतीय संविधानाने "आम्ही भारताचे लोक " या वाक्याने संविधानाची सुरुवात केली . शिवरायांच्या स्वराज्यातील लढणाऱ्या विरास "मावळा " म्हटले गेले संविधानाने आपली ओळख आपल्याला "आम्ही भारताचे लोक " अशी करून दिली ही ओळख कुठलाही जात - धर्म -पंथ दर्शवणारी नव्हती सार्वभौम , समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय ,स्वातंत्र्य , समता व बंधुता याची रुजवन करणारे आहे त्यामुळे स्वाभिमान जागृत होतो व समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचे मन - मस्तक आणि मनगट मजबूत होते .
स्वातंत्र्य म्हणजे मी कुणाचाही अंकित नाही . मी पूर्णपणे सर्वांगाने मुक्त आहे . स्वैर आहे कोणाचाही देणेदार नाही . मानवतेची मूल्य जोपासत मी मानवधर्मास जपणारा स्वतंत्र मानवतावादी आहे . स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच स्वातंत्र्यात मानवीमूल्य जोपासत जगणे ही आपली जबाबदारी ठरते .स्वातंत्र्याचा खरा अर्थ तर मानव कल्याणार्थ झटणे , दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे तथा त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे असाच होतो . दया , क्षमा , शांती ,समता , बंधुता याचे भान ठेवत कृतघ्न न होता कृतज्ञ राहणे असाच आहे . आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत आपल्याला काहीही करावे लागत नाही असा समज आपला सुखी जीवन जगत असताना आहे , पण येणाऱ्या काळात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याचाही वेध घेण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील .शहीद भगतसिंह यांची " जेल डायरी "
मधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .
*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*
*मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*
*परंतु ,खरंच आहे का,*
*तुमच्यात धमक आणि तुम्हाला स्वातंत्र्य ?*
*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*
*तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*
*तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*
*मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*
*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*
*जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*
*अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*
*जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*
*त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*
*उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*
*त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*
*केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*
*त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*
संजय खांडवे
इतिहास अभ्यासक
बुलढाणा
9011971122
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
शनिवार, २३ मार्च, २०२४
शिवाची १ ०८ रुपे
महादेव
वीरूपाक्ष
चंद्रार्धककृतशेखर
अमृत
शाश्वत
स्थानू
नीलकंठ
पिनाकी
वृषाभाक्ष
महाज्ञेय
पुरुष
सर्वकामद
कामारी
कामदहन
कामरूप
कपर्दी
विरूप
गिरीश
भीम
सॄक्की (म्हणजे मोठे मोठे जबडे वाले)
रक्तवासा
योगी
काल दहन
त्रिपुरघ्न
कपाली
गूढव्रत
गुप्त मंत्र
गंभीर
भाव गोचर
अणिमादीगुणाधार
त्रिलोकेश्वर्यदायक
वीर
वीरहंता
घोर
विरूप
मासल
पटू
महामासाद
उन्मत
भैरव
महेश्वर
त्रैलोक्यद्रावण
लुब्ध
लुब्धक
यज्ञसूदन
कृतिकासुतयुक्त
उन्मत
कृत्तीवासा
गजकृत्तीपरिधान
क्षुब्द
भुजंग भूषण
दत्तालंब
वेताल
घोर
शाकिनी पूजित
अघोर
घोरदैत्यग्न
घोरघोष
वनस्पती
भस्मांग
जटिल
शुद्ध
भेरुड शतसेवित
भूतेश्वर
भूतनाथ
पंचभूताश्रित
खग
क्रोधित
निष्ठूर
चंड
चंडिश
चंडिका प्रिय
चंडतुंड
गरुत्मान
निस्त्रिश
शव भोजन
लेलिहान
महारौद्र
मृत्यू
मृत्यूर गोचर
मृत्योमृत्यु
महासेन
स्मशानारण्यवासी
राग
विराग
रागांध
वितराग
शतार्ची
सत्व
रज
तम
धर्म
अधर्म
वासनवानुज
सत्य
असत्य
सदृप
असदृप
अहेतुक
अर्धनारीश्वर
भानू
भानुकोटीशतप्रभ
यज्ञ
यज्ञपती
रुद्र
ईशान
वरद
शिव
शिवाची १ ०८ रुपे
*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*
*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*
➖➖➖➖
आजचा पाकिस्तानचा भाग असलेला ल्यालपूर बंगा येथे 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंहाचा जन्म झाला . आई विद्यावती कौर आणि वडील किशनसिंह यांच्या संस्कारातून भगत सिंहासारख्या महापुरुषाची जडणघडण झाली . देशभक्तीचे वातावरण त्यांच्या घरातच होते त्यांच्या आजोबापासून प्रत्येक जन क्रांतिकारी चळवळीशी जुळलेले होते . यावरून लक्षात येते की भगतसिंह ज्या गोतावळयात वाढले त्यात क्रांती केवळ बोलण्याचा विषय नसून तर प्रत्यक्ष कृतीचा विषय येतो . संघर्ष , त्याग, बलिदान या गोष्टी तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी जगण्याची प्रेरणाच होती . त्यांचे काका स्वर्णसिंह आणि अजितसिंह यांच्या देशभक्तीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता .आजही भगतसिंहाचे नाव जरी उच्चारले तरी मानवतेशी जुळलेल्या चेतना ज्यांच्या हयदयात आहे त्यांची देशभक्ती आपसूकपणे जागृत होते . देशासाठी अन मानवतेसाठी काहीतरी करावं ही भावना मनात तयार होते . भगतसिंहाचे चरित्र तरुणांसाठी एक आदर्श आहे स्वातंत्र्यासाठी आणि मानवाच्या कल्याणार्थ स्वाभिमान कसा जागृत ठेवावा आणि त्यासाठी संघर्ष कसा करावा ,याचबरोबर त्यागाचे ही सर्वोच्च प्रेरणास्थान भगतसिंह ठरतात . अगदी बालपणापासून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती किती ओत प्रत भरलेली आहे हे त्यांच्या एका प्रसंगावरून दिसून येते .एकदा मेहता आनंद किशोर हे क्रांतिकारक भगतसिंहाच्या घरी आले होते . तेव्हा चार वर्षाचा भगत लाकडी बंदुका शेतात चिखलात फिरत होता . मेहतांनी विचारले, "काय करतोस ? "तेव्हा भगतने उत्तर दिले कि, "मी बंदुका पेरतो आहे ,उद्या या झाडांना बंदुका लागतील आणि त्या घेऊन मी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावेल . " चार वर्षाच्या भगतसिंहामध्ये हा अलौकिक आत्मविश्वास कोठून निर्माण झाला ? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयापुढे आणि त्यांनी केलेल्या संस्कारापुढे आपसूकपणे आपण नतमस्तक होतो .ही त्याग अन देशाप्रती समर्पित होण्याची भावना त्या बालकाच्या मनात निर्माण होणे ही त्यांच्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या मातृभूमी प्रति असलेल्या उच्च कोटीच्या असामान्य देशभक्तीचीच प्रचीती आहे .
देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून स्वतंत्र करणे हा त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता . गुलामगिरीत खितपत पडणे त्यांना कदापिही मान्य नव्हते . स्वातंत्र्यासाठी ते आयुष्यात कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते .आपला देश गुलामगिरीत आहे आणि आपण स्वस्थ बसायचं हे त्यांना अजिबात मान्य नव्हते . भगतसिंह जेलमध्ये असताना देखील ते कधीच थांबले नाही त्या ठिकाणी सुद्धा वाचन ,चिंतन आणि लेखनाचा विडा त्यांनी उचलला होता .1929 मध्ये भगतसिंहांना अटक झाल्यावर ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते .त्यांना फाशीची शिक्षा झालेली असून सुद्धा ते किंचितही विचलित झाले नव्हते . कोणत्याही प्रकारचे दुःख त्यांना जाणवत नव्हते .अलौकिक आत्मविश्वासासह अगदी निर्भीडपणे शिस्तबध्द तेने त्यांनी आपला वेळ तुरुंगात असताना अभ्यासात ,वाचनात अन लेखणात घालविला .713 दिवसाच्या तुरुंगवासात इंग्रजी ,हिंदी ,बंगाली , उर्दू भाषेतील 302 ग्रंथ वाचून काढले .या वाचनातून आपले क्रांतिकारी विचार त्यांनी पुढे लेखनबद्ध केले .तत्कालीन परिस्थितीचा विचार करत देशाच्या च नव्हे तर जगाच्या सुद्धा सामाजिक, राजकीय ,धार्मिक ,आर्थिक ' सांस्कृतिक विषयांची तर्कसंगत पद्धतीने विचार करून त्याची मांडणी केली . साम्राज्यवाद , सामंत शाही ,लोकशाही , भांडवलशाही या विषयावरही भाष्य केले . जगातील सर्वच महत्वाच्या राजकीय क्रांतीचा अभ्यास केला . स्वातंत्र्याच्या महानकार्यासाठी , मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानाचे महत्त्वही त्यांनी आपल्या लिखाणातून विषद करत धर्माचा ही तुलनात्मक अभ्यास करून नास्तिकतेची परिभाषा त्यांनी या बंदीवासात असताना केली आहे .या काळात त्यांनी चार ग्रंथ लिहून काढले . यामधील "Why I am an Atheist " हा लेख प्रत्येक भारतीय तरुणांनी वाचलाच पाहिजे असा आहे .भारतीय तरुणांपुढे भगतसिंहांचा आदर्श आहेच, पण फोटो पाहून आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्टेटस ठेवण्यापुरता किंवा "इन्कलाब जिंदाबाद ! " एवढंच म्हणण्यापुरता नसावा .तर भगतसिंहांनी लिहिलेले तुम्हा आम्हा सारख्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे भगतसिंहाचे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे .
त्यांच्या जेल डायरीमधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .
*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*
*मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*
*परंतु ,खरंच आहे का,*
*तुमच्यात धमक आणि तुम्हाला स्वातंत्र्य ?*
*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*
*तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*
*तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*
*मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*
*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*
*जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*
*अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*
*जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*
*त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*
*उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*
*त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*
*केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*
*त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*
यावरून लक्षात येते की शहीद भगतसिंह हे स्वातंत्र्य आणि गुलामगिरी याबद्दल काय म्हणत होते . सत्याच्या बाजूने उभे राहणे हे 17 व्या शतकातील महाराष्ट्रातील पहिले मराठी लोककवी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या काव्यातून सांगितले होते "सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानिअले नाही बहुमता ॥" तेच पुढे 19 व्या शतकात जेम्स रसेल आपल्या काव्यातून मांडतात व पुढे सत्याची अन सत्यासाठीची त्याग अन समर्पनाची क्रांतिकारी धार भगतसिंह आपल्या क्रांतीतून दाखवून देतात .ते म्हणत मानवतेला प्रभावित करणाऱ्या सर्वच गोष्टीशी माझा संबंध आहे .त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही प्रतिकूल परिस्थितीत सखोल वैचारिक चिंतन घडवून एक आदर्श नव तरुणांपुढे उभा केला .आपल्या देशाचे उज्वल भविष्य कोठे आहे हे त्यांनी जाणले होते म्हणून त्यांचे विचार हे मानवतेच्या कल्याणार्थ आजही लागू पडतात .
*तुझे जब़ह करने की खुशी मुझे मरने का शौक,*
*मेरी भी मर्जी है , जो मेरे सैय्याद की है ।*
हसत हसत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारी वीर शहीद भगतसिंहास विनम्र अभिवादन .
➖➖➖➖➖🌷
संजय खांडवे
9011971122
शनिवार, ९ मार्च, २०२४
नमः शिवाय
*नमः शिवाय ।*
〰️〰️〰️〰️〰️〰️
सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात .आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिव शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त शिवाची भक्ति करत असतात . यामध्ये पुरुष असो वा स्त्री हे दोघेही तेवढीच श्रद्धा शिवशंकरावर ठे वतात .अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत .शिवलिंगाच्या रूपाने सर्वत्र शिवउपासना होते . हे शक्तीचे प्रतीक मानले जाते . स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्याचे संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात .भगवान महादेवाच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे ब्रह्मदेव पुढे शिवांच्या प्रेरणेनेच देव, असूर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात .असे शिवपुराण सांगते .भगवान शिव शंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्या नंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावांची एक मोठी यादीच तयार होते .आदिनाथ, आदी योगी या नावाने ते प्रसिध्दच आहे .आदी हा शब्द त्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतो .गंजांतक, जिमूतवाहन, सदाशिव , वृषभध्वज ,परमात्मा , परब्रम्ह ,श्रीनिलकंठ ,ईश्वर , शंभू , महेश्वर , हर ,चिदानंदस्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत .निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय , चंद्रकला विभूषण, विष्णूकमल, विष्णूक्षेत्र, वेदांतवेद्य ,जटाजुटधारी, त्रिगुणातीत,भ्रमणशील, भक्तवत्सला, दयासिंधू , शंभू ,जितेंद्रिय , महेश , सृष्टीकर्ता , दुर्गेश, जगन्नाथ , मृत्युंजय , दीनबंधू ,दयासिंधू ,शर्वा, , परमतत्वमय, अविनाशी , सर्वेश्वर सहारा कर्ता, दिनबंधू ,पशुपतीनाथ,भैरव , वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्दी मुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत . ' "सर्वो वै रूद्र: " रुद्रच सर्व आहे या महा वाक्यातून ते सिध्द होते . स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखले जाते जसे सिध्देश्वर ,मानकेश्वर ,बुदनेश्वर,पाताळेश्वर ,केहाळेश्वर ,रामेश्वर अशी अनेक नावे आहेत .
आणखी कितीतरी रुपे ही शिवाची आहे.भ्रमर कोषात शिवाची ४८ नावे आहेत .वेदांची निर्मिती होण्याअगोदर पासून शिवाची पूजा होत आली आहे .प्रागैतिहासिक काळात शिव निरंजन निराकार होते .ते स्मशानात राहत ,शरीराला भस्म लावत ,मुंडमाला धारण करत,साप अलंकार रूपाने धारण करत,ते महायोगी पेक्षाही मोठे होते.
सर्व संस्कृतीने त्यांचा स्वीकार केला होता .त्यागी -निर्लोभी-निर्लेप दैवत म्हणजे शिव होय .
शिवाची अतिप्राचीन काळापासून उपासना केली जाते .यांचे काही मूर्तीप्रकार आहेत .
सुखासन,सोमस्कध,चंद्रशेखर,वृषारूढ,नृत्यमूर्ती,गंगाधर,त्रिपुरान्तक,कल्याणमूर्ती,अर्धनारीश्वर,भद्ममूर्ती,पाशुपत,कंकाल,हरीहर,भिक्षाटन,गणेशानुग्रह,दक्षिणमूर्ती कालारि,लिंगोद्वव,श्रीपंचाश्रीपंचाधर,ललाट तिलक ही शिवाची मूर्ती रुपे आहेत .
उत्तर भारतात शिवाची १२ रूपांची उपासना केली जाते .
सद्योजात,वामदेव,भ्रषोर,तत्पुरुष,ईश,मृत्युजय विजय,किरणाक्ष,भदोरास्त्र,श्रीकंठ,सदाशिव,द्वादशकला संपूर्ण मूर्ती ही ती १२ रुपे आहे .आपण दक्षिण भारतात गेलो तर १८ रूपाचे पूजन होते.ही पुढील सहा रूपे त्यामधे येतात . अर्धनारीश्वर,चंदेशानुग्रह,कालाहमूर्ति,कल्याणमूर्ती,त्रिपुरान्तक,उमास्कंध .
शिवलिंगाचेही प्राचीन काळापासून खूप महत्व आहे.नदीच्या उगमस्थानावर किंवा काठावर शिवलिंगाची स्थापणा प्राचीन काळापासून होतांना दिसते .मंदीराच्या आकाराच्या प्रमाणात शिवलिंगाची रचना केलेली दिसते .शिवलिंग मोठे असल्यास त्याची स्थापणा बाहेर ओटयावर केलेली दिसते .
शिलादपुत्र नंदी हा चंद्रार्थभूषणांचा अत्यंत प्रिय पार्षद होता . तो अत्यंत परमज्ञानी व विवेकपारायणी होता .नंदी हे शिवाचे प्रिय वाहन आहे .शिवमंदिरात नंदीची स्थापणा अनिवार्य असते.प्राचीन काळात विदेशातही नंदीची पूजा होत असे.मिस्त्र,बेबोलियन,
सिरिया आदि विदेशी संस्कृतीत बैल (नंदी)चे महत्व दिसते .५००० वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृती मध्ये वृषभ मूर्ती आढळलेल्या आहेत.आपण दक्षिण भारतात गेलो की नंदीच्या विशाल मूर्ती दिसुन येतात .शिवालयासमोर नंदीसाठी स्वंतत्र मंडप असल्याचा नेम दिसून येतो .महाराष्ट्रात कैलास लेणीमध्ये नंदीसाठी स्वंतत्र दालन शिवालयासमोर आहे . अगदी तसेच सुंदर असे नंदीमंडप गडचिरोली मधील मार्कडेश्वराच्या मंदिरा समोर स्थित आहे . यज्ञ प्रसंगी दक्षाच्या शिवविरोधाला नंदिने परखडपणे प्रति उत्तर दिल्याचे शिव पुराण सांगते .
शिव हा एक विचार प्रवाहच आहे गत पाच हजार वर्षापासून चालत आलेला दिसतो .शिव हे कृषीसंस्कृतीचे एक प्रेरणादायी स्वरूप आहे त्यांना पशुपतीनाथही याच अर्थाने म्हटले जाते .हिमवान व मेना यांची पुत्री उमा व शिव यांच्या शिवविवाहात असंख्य कोटी गण , देवी , देवता व ऋषी मुनीच्या उपस्थितीत गंगा , यमुना , गोदावरी तथा असंख्य नद्यांच्या सानिध्यात विवाह पार पडत असतांना ध्वज ,पताके , आंबे केळी आदि खांबाचे मनोरे उभारून मंडप टाकला जातो . सप्तमातृ कांची उपस्थिती व गर्गाने उमा पार्वतीची तांदुळाने ओटी भरणे . अक्षदा, कुश व जलाने शिवाची ओवाळणी हे शिवविवाहाचे प्रसंग कृषी परंपरेचे नाते सांगतात व आजही ते आपण आपल्या शुभ कार्यात जपतो .
शिवाचे तांडव हे या विश्वाचा नाश नाही तर संचलणार्थ आहे ,ज्याने निर्मिले तो नाश कसा करेल ?
शिवाने 'सत्य' ह्यासाठी व विश्वाच्या संचलणार्थ असंख्य निवाडे पुराणात आढळतात
महादेवास भोळा सांभ ही म्हटले जाते म्हणजे महादेव हे अगदी सहजतेने म्हटल्यापेक्षा कोणताही भेदभाव न पाळता सदैव मदतीस तत्पर अशी देवता !
अन्न,वस्त्र,निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा या गरजे व्यतिरिक्त मिळवणे म्हणजे मोह ,वासना,आसक्ती
आणि मनुष्य प्राण्याने मूलभूत गरजा व्यक्तीरिक्त जे धन आहे त्यापैकी काही ज्याचा मूलभूत गरजा अपूर्ण आहेत त्यांना दान करावे असे सांगत धनसंचय करणाऱ्या कुबेरासही महादेवांनी फटकारले होते हे माझ्या वाचनात आहे.
समुद्रमंथनातील विष सृष्टीच्या संचलणार्थ आपल्या कंठात सामावणारे संपुर्ण विश्वाच्या न्यायनिवाड्यात ही केवळ आणि केवळ सत्य ह्या विषयावर ठाम राहूण पुराणामध्ये न्याय देतांना दिसतात
न्याय दर्शनाचा विचार सांगत पुढील येणाऱ्या काळात सत्याच्या चिकित्सेसाठी गौतम ॠषींना सहा दर्शना पैकी "न्याय" दर्शनाची मांडणी करायला सांगतात
शिवाची अनंत रुपे हया विश्वाच्या अनंत हर्षासाठी आजही तुमच्या आमच्यात जेथे सत्य आहे
जेथे पविञता आहे
जेथे विचाराची सुंदरता आहे
जेथें मनुष्यजातीची सेवा आहे
जेथे मोह,माया,लोभ,आसक्तीला
स्थान नाही
तेथे निश्चितच देवादीदेव शिवाचाच वास आहे
➖➖➖➖➖➖
नमः शिवाय
संजय खांडवे
9011971122
प्रवास वर्णन
माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...
-
*महा वारसा* विश्वाची निर्मिती संदर्भात चर्चा करतांना जो महत्वाचा विचार समोर येतो की, एका मोठ्या महाविस्फोटातून विश्वाने आकार घ...
-
* *दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड* स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली - पाली १३८कि. मी ., मुंबई वर...





































