"आता आमच्या धडावर आमचेंच डोके असेल"
सोळा वर्षापूर्वी हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले अन खऱ्या अर्थाने माझ्या विचार करण्याच्या शैलीत बदल झाला .अन जीवनाकडे चिकित्सक दृष्टीकोनाने बघु लागलो
सरांचे "विद्रोही तुकाराम " वाचले व विद्रोहाचा अर्थ समजला,जगतगुरुचे सपूर्ण जीवनचरित्र कळाले व तुकोबाच्या या पुस्तकाने माझ्या वाचनछंदाला बळ मिळाले .
"बळीवंश" मधून आपली ५००० वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती सरांच्या गाढया अभ्यासातून,आपण कल्पणाही करु शकत नाही येवढी मेहनत ,संस्कृतचे गाढे अभ्यासक ,सर्व प्राचीन ग्रंथाचे अभ्यासपूर्ण विवेचन करुन केलेली मांडणी विचार करायला लागणारी आहे
"पुस्तक लिहतांना सरांनी वापरलेली सदर्भ सूची ,ग्रंथ याचेच एक पुस्तक बनते हे महत्वाचे "
जाणण्याची इच्छा ही जीवन अधिक सुदर बनविते हे यातूनच कळाले .
सरांनी मांडलेले चार्वाक समजून घेतांना सर्व सदर्भ जुळत गेले ,अन चार्वाकापासून वैचारिक प्रवासाला सुरूवात झाली आणि ती बाबासाहेबापर्यन्त मला कळाली
आ ह सरामुळे मलाच नाही तर लाखोंना खऱ्या अर्थाने तथागत कळाले " ।सर्वोत्तम भूमीपूत्र गोतमबुद्ध"
या पुस्तकामुळे मला बुध्दविचार कळाले येवढच नाही तर बुद्धसाहित्य जाणण्याची ओढ वाढली.
आ ह सर मला असे एकमेव विचारवंत आहे असे वाटते की त्यांनी विचारांची चिकित्सा तर केली त्यावर लिखान केलेच पण त्या चिकित्सेची चिकित्साही केली व त्याचे लिखान सर्वापुढे मांडले ,बहुतेक लेखक लिखान करतात व त्यावर केलेली चिकित्सा मात्र त्यांना मांडता येत नाही ,उत्तरे देता येत नाही ,सदर्भही जुळत नाही
" देव माणता की नाही याही पेक्षा माणूसपण जपता की नाही हे महत्वाचे "
जगत असतांना ही "माणूसपणाची शिकवण" सरांचे अगाध साहित्य सांगून जाते
प्राचिविदयाप्राप्त,संस्कृतचे गाढे अभ्यासक,जगातील जवळपास सर्व सस्कृतींचे अभ्यासक,आधुनिक तुकोबा,संत साहित्यावर अगाध लेखन करणारे,
आ ह साळुके सरांचा आज वाढदिवस,सर आपणास उदंड आयुष्य लाभो !
संजय खांडवे
