जगतगुरू तुकोबाराय -जयंती विशेष
भक्ती चळवळीचा पाया महाराष्ट्रातच घातला गेला.भारतात ही चळवळ दक्षिणेकडून उत्तरेकडे कालांतराने सरकत गेली .पुंडलिकाची विठ्ठल भक्ती सर्वश्रृत आहे .अनेक अभ्यासकाच्या मते पुंडलिकाचा कालखंड काढता आला तर वारकरी पंथाचा उदय काळही समजेल .कृतयुगातील हरी,त्रेतायुगातील राम,द्वापरातील कृष्ण हे तिन्हीमिळून साकारलेल्या कलयुगीचा समचरणी विटेवरी उभा असलेला, सर्वाभूती समदृष्टी असलेला विठ्ठल हे वारकरी पंथाचे वैष्णवांचे एकमेव दैवत होय . संतशिरोमनी नामदेवांनी पंढरीचे वर्णन करतांना म्हटले आहे
"जेव्हा नव्हते चराचर |तेव्हा होते पढ़रपूर ॥
या पूर्वी विठ्ठल उपासना होत होती विठ्ठल संप्रदायही होता पण संघटीत पध्दतीने वारी करण्याची वारकरी परंपरा संत नामदेव,संत ज्ञानेश्वर यांच्या काळात सुरु झाली .पुढे संत एकनाथांच्या भारुड,किर्तनातून व संत तुकारामाच्या अंभगातून हा विठूरायांच्या वारकरी प्रबोधनाचा मेळा अखंड सुरू होता .संत बहीणाबाईच्या नुसार या वारकरी भक्ती परंपरेचा कळस तुकारामांच्या रूपाने पूर्ण झाला . तुकारामांच्या गाथेतून भागवत धर्माचे सार सोप्या भाषेत जनमानसात पोहचले.जगण्याचे सार सांगणारी व जगण्याचं बळ देणारे तुकारामांचे जीवनही तेवढेच संकटमय होते .त्याच्या आयुष्यात त्यांनी असंख्य घाव सोसले ,आत्मकेद्री व चिंतनशील तुकारामांनी समाजाप्रती आपले आयुष्य वाहीले होते .स्वतःच्या संसाराबरोबर समाजाच्या संसारासाठीही तुकाराम महाराज जगले .बोल्होबा व कनकई यांच्या पोटी तुकारामांचा जन्म झाला .सावजी व कान्होबा हे त्यांचे बंधू .देहू परिसरातील एक प्रतिष्ठीत धनधान्य सपन्नता त्यांना लाभलेली होती.१३ वर्षाचे असतांनाच त्यांचे लग्न झाले वडील लवकरच वारले पाठोपाठ आई सुद्धा त्यांना सोडून गेल्या . त्यावेळी तुकारामांचे वय १७ -१८ वर्षाचे होते .त्यांच्या पत्नी रखमाबाई हया दम्याच्या आजाराने लवकरच गेल्या .त्यांचा मुलगा संताजी सुद्धा आजारपणातच गेला .त्याच वेळी त्यांचे मोठे बंधू सावजी यांच्या पत्नी सुद्धा गेल्या यामधे सावजी घर सोडून गेले .हा सर्व दुःखाचा डोंगर तुकारामांच्या सुरूवातीच्या आयुष्यातच त्यांच्यावर कोसळला.जगण्याचा मंत्र देणारे तुकाराम महाराज कधीही डगमगले नाही.आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अत्यंत निष्ठेने सांभाळली .त्यांच्या डोक्यात कधी नकारात्मक विचार आलाच नाही .त्याच काळात प्रचंड दुष्काळही पडला होता .तत्कालीन धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकिय समाजजीवनाचा अभ्यास तुकारामांना होता .बुडणाऱ्या समाजाला जर वाचवायचे असेल तर मला काहीतरी केले पाहिजे नव्हे तर करावेच लागेल ही भावना त्यांची होती .तुकारामांना अवघे ४२ वर्षाचे आयुष्य लाभले .त्यांचे चरित्र हे सदैव प्रेरणादायी ठरते.धर्मशास्त्र,वेद,पुराने आदिची चिकित्सा करून मानवजातीच्या कल्याणार्थ आदर्श समाजरचनेचा पाया त्यांनी जगासमोर मांडला .त्यांच्या अभंग गाथेतून मानवी जीवनाशी निगडीत प्रत्येक मुद्दा साध्या व सोप्या भाषेत हातळला गेला.मानवी जीवनात सार्वकालिक मार्गदर्शक ठरणारे विचार या गाथेतून तुकारामांनी मांडले .संत तुकारामांचे अभंगशतक या पुस्तकातुन आईवडील,संत,संगत,हितासाठी उपदेश,शब्द,अनुभव,चमत्कार,संसार,शेती,प्रयत्न,आघात,सत्य,शुद्धता,नम्रता,क्षमा,शांती,प्रसिध्दी,किर्ती,मन,आनंद या विषयावर आधारीत त्यांचा गाथेतून निवडक १०० अभंगांचे विश्लेषण डॉ आ ह साळुके सरांनी त्यांच्या समपर्क भाषेतून केले आहे.शब्द हेच धन,शस्त्र तुकारामांनी तत्कालीन शोषण व्यवस्थेवर थेट पणे प्रहार केलेला दिसतो .तुकोबांनी मांडलेला एक एक शद्ब या स्वातंत्र्य युद्धातील एक एक शस्त्रच होते .व त्यांनी मांडलेला एक एक शद्ब म्हणजे समाजाच्या नव्या रचनेसाठी काळजीपूर्वक ठेवलेला एक एक वीटही होता असे डॉ आ ह साळुके सर मांडतात .त्यांचा प्रत्येक अभंग म्हणजे एक पुस्तकच म्हणावे लागेल .आज आमच्या सारख्या नव वाचकांना तुकारामांच्या अभंगाची गोडी डॉ आ ह साळुंखे सरासारख्या महाविद्वान विचारवंताच्या लेखनातून झाली .विद्रोही तुकाराम या माध्यमातूम तुकारामांचा विद्रोह कळाला.अलिकडच्या काळात विजय गवळी सरांच्या तुकास्त्रामधून अधिकच तुकाराम जवळचे वाटू लागले .गाथा परिवारातील उल्हास पाटिल सरांचे अभंगानुसार प्रत्येक अभंग कसा सार्वकालिक आहे आजही तो आधुनिक समाजव्यवस्थेत कसा लागू पडतो हे उल्हास पाटील सरांच्या विश्लेषणावरून लक्षात येते .या ना त्या कारणाने संत तुकाराम जवळचे वाटू लागतात त्यांचा संघर्ष आजही आपला संघर्ष वाटू लागतो .त्यांचा विद्रोह हा आजही आपला विद्रोह वाटून त्यांच्या विचारांचा अनुयायी बनण्याची प्रेरणा देत राहतो .सर्व जाती धर्माच्या माणसाला संतपदापर्यन्त नेवून पोहचविणारे ; अध्यात्मीक लोकशाहीचा पाया रचणाऱ्या व आपल्या संस्कृतीचे प्रातिके निर्माण करणाऱ्या वारकरी सप्रदायात तुकारामांची गाथा मैलाचा दगड ठरते .
का जुळते ही नाळ तुकारामांशी ? का भिडतात त्यांचे शद्ब त्रीक्ष्ण हत्याराप्रमाणे ?का वाटत नाही भिड भाड प्रश्न विचारायची ?का गळून पडतो अहंकार ?
का आग्रह धरावासा वाटतो सत्याचा ?
का वाटू लागतात वृक्ष वेली आपली सगी सोयरी ? असे ना ना विध प्रश्न पुढे उभे राहतात प्रत्येक अभंग एक तरी प्रश्न पुढे उभा करतो व ते हयदयाला भिडतात .
सिद्धीचा दास नव्हे श्रृतीचा आंकिला । होईल विठ्ठला सर्व तुझा ॥
कोणत्याही बाहय शक्तीच्या अधिन न जाता ,अंकित न होतां सर्वशक्तीमान अश्या विठ्ठलाचा पर्याय सामान्याला देतात .कोणत्याही पाप पुण्याचे भय विठोबा समोर त्यांना राहीले नव्हते. पूर्ण पणे विठ्ठला।ला स्वाधिन झाल्याने कशाचेही भय उरले नव्हते .सावळे रूप डोळ्यानी पहावे ,देच सहा शास्त्रे ,चार वेद व अठरा पुराने यांचे सार आहे.शास्त्राचे सार आणि वेदांची मूर्ती असलेला ईश्वर हा माझा प्राणसखा सांगाती आहे .म्हणून मला इतर कोणाची इच्छा नाही ,विठ्ठलाच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवणें हाच माझा धर्म व हीच अवघी निती होय . या वारकरी चळवळीत आपल्या कुटुंबाची सेवा व रक्षण करणे हे विठ्ठल उभारणीचे एक कारणच म्हणावे लागेल .समचरणी उभा असलेला विठ्ठल हे समतेचे तत्व आहे.एकादशी,कार्तिकी ,आषाढीला एकत्र येणे ही अध्यात्मीक लोकशाहीची बांधणीच आहे.समतेची भगवी पताका ही त्याचे प्रतिकच आहे.या सामाजिक व सास्कृतिक लढयात साक्षात देवांनाही प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य निर्माण करुन ईश्वराच्या वर्तनालाही नैतीकतेची कसोटी लावली . त्याच परंपरेने वेदांनाही आव्हाण दिलेले आहे .
वेदांचा तो अर्थ आम्हाची ठावा । येरांनी वाहवा भार माथा ॥
या नंतर तुकारांमांना कोणत्या प्रसंगाना सामोरे जावे लागले तो वेगळा भाग आहे त्याचे विवेचन स्वतंत्र होऊ शकते .
आता आम्हा भय बा कोणाचे ।
बळ विठोबाचे आले ऐसे ।।
कुणाचेही भय न बाळगता सर्व सामान्याना कोणत्याही आडकाठी न ठेवता सहज भेटणारा विठ्ठलाचे बळ त्यांच्यात निर्माण झाले .कोणत्याही मूर्तीपूजेचा आग्रह न धरता निर्गुण भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.निर्गुण भक्ती म्हणजे कुणीही केवळ गंध टिळा लावून नामस्मरण केले तरी तुम्हाला परमेंश्वर भेटू शकतो .कुणीही सान थोर न ठरता समतेची मांडणी करुन आपला व्यवसाय व कुटुंबाचे पालन निष्ठेने करत ह्या भक्तीमार्गात दृढता निर्माण केली.
कासाया एकांत सेवू वाडा ।
आनंद जो जनामाचि असे ॥
मी जंगलात,वनामधे एकटा राहुण काय करणार आहे ?माझा खरा आनंद माझ्या कुटुंबात, माझ्या समाजात ,माझ्या लोकात राहून त्यांच्या साठी झिजण्यात आहे हा निर्गुण भक्तीचा आदर्श त्यांनी घालून दिला .
योग तप याचि नावे ।
गळीत न्हावे अभिमाने ।।
कोणत्याही प्रकारचे बडेजावपणा न करता योग आणि तप कशाला म्हणायचे तर अहंकार गळून पडतो तोच योग व तप आहे येवढया तोडक्या शद्वात अलौकिक वाटणाऱ्या संकल्पणा तुकारामांनी जन सामान्यात मांडल्या आणि त्या त्याच्या पर्यन्त अभंगाच्या रूपाने पोहचविल्या .हीच भावना सामान्याच्या हयदयात आजही भिडलेलीच आहे .या पवित्र मातीत अशी कुठली जागा नसेल ,त्या ठिकाणा पर्यन्त तुकारामांची शब्दवाणी पोहचली नसेल .चराचही उत्साहाने आज त्यांचे अभंग व्यक्त होतांना जाणवतो .तुकारामांची गाथा बुडविणाऱ्या हातांनी आणि त्यामागच्या शक्तीनेही कधी गाथा बुडवत असतांनाही विचार केला नसेल ! आज या मातीत जगतगुरुच्या रूपाने संत तुकाराम वास करत आहे.
जनमानसात ,घराघरापर्यन्त पोहचलेले अन मुखोतगत झालेले तुकाेबांचे अभंग हाच परिवर्तनासाठी सर्वात सोपा मार्ग वाटतो,प्रत्येक घरात जगतगुरू तुकाेबांची गाथा असणे अत्यंत आवश्यक वाटते,तुकोबांची शब्दरत्ने ही खूप महत्वाची मानवी मूल्ये ,नैतिकमूल्ये जपणारी आहेत ,अगदी जन्मापासून मृत्युपर्यन्त जीवनातील प्रत्येक पैलूवर अगदी निर्भिड भाष्य आढळते .
आजच्या काळात माणूस परिर्वतन आपल्या सोईने स्वीकारतो व घोळ होतो,सुईच न घेता सोईच स्वीकारतो आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण आपल्या मूळच्या आदर्शोंना विसरतो,वास्तवतेला विसरुन कल्पना विलासातील बाबी खऱ्या मानायला लागतो मग श्रद्धा-अंधश्रध्देचा घोळ होतो . मानवी स्वभावच असा आहे की तो अदभूत,विलक्षण,चमत्कारीकबाबीकडे वास्तविक गोष्टीपेक्षा अधिक आकर्षित होतो व त्याच्या कुतुहलाच्या कल्पनाविलासात गुंग होतो .तुकाेबांचा गाथेत वास्तविकता आहे ती समाजाभिमूख ,विज्ञानवादी मन मनाला भिडणारी आहे .
जगतगुरू तुकोबांचे सपूर्ण चरित्र हे प्रेरणादायी आहे.आज जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या आदर्शाना जपू या ! विचारांच्या रूपाने जीवन सार्थकी करणाऱ्या तुकारामांच्या गाथा ह्या प्रत्येक कुंटुंबात पोहचवू या ! एक नवा संकल्पाने जगतगुरू तुकाराम महाराजांच्या जयंती सोहळा घराघरात या वर्षी पासून साजरा करू या !
संजय खांडवे
9011971122