।🚩🚩🚩🚩🚩🚩
*मध्ययुगीन इतिहासातील पहिला स्वातंत्र्य दिन सोहळा..........शिवराज्यभिषेक*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आठव्या शतकाच्या अखेरीस समृद्ध,संपन्न अश्या भारतभूमीवर परकीय आक्रमणे सुरु झाली होती .समृध्द अश्या परंपरेत सामंतशाही तोंड वर काढत चालली होती .महम्मदबीन कासिम हया अरब सेनापतीने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केला.सुरूवातीच्या काळात या आक्रमणामागे लुटीचे प्रलोभन असे .पुढे ही परकीय आक्रमणे सतत होत राहिली .महसूलावर यांचे सैन्य पोसवू लागले ,महसूल हा शेतीवर आला व या रूपाने सुद्धा शोषणास सुरूवात झाली .दहाव्या शतकाच्या अखेरीस महमद गझनी आला .पुढे १२ व्या शतकात महम्मद घोरी आला त्याच्याशी पृथ्वीराज चौहाण यांनी या भारतभूमीसाठी मोठा संघर्ष केला .या पहिल्या आक्रमणापासून पुढे ८०० वर्ष ही परकिय आक्रमणांची श्रृखलाच होती .दिल्ली काबीज करून हे लोण नर्मदापार दाक्षिणपथापर्यन्त पोहचले.१४ व्या शतकात या भागात आक्रमणे झाली .दक्षिण भारतात बहामणी साम्राज्य उदययास आली.पुढच्या काळात ही बहामनी सत्ता दुबळी होऊन अदिलशाही,कुतुबशाही,बरीदशाही,इमादतशाही,निजामशाही उदयास आल्या.यांच्या संघर्षात रयत त्रस्त झाली .काही लोकांच्या नेमणूका करुन कर वसूली होऊ लागली .यातून प्रचंड शोषण होऊ लागली .समाजाचा स्तर खालवत चालला होता .उत्तर -दक्षिण या दोन्ही सत्तापिपासू लोकांची प्रचंड दहशत निर्माण झाली होती .असा हा मध्ययुगीन इतिहासाचा उत्तरार्ध तर अंधारमय झालेला होता.लेकी-बाळी सुध्दा सुरक्षित नव्हत्या .जगणेही जड होऊन बसले होतें .
याच काळात भोसले-जाधव कुलवंशीय आपल्या मनात स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवत तत्कालिन परिस्थितीनुरूप आपले कार्य करत होते.हे समकालिन ऐतिहासिक संदर्भावरून दिसून येते .याची प्रचिती स्वराज्याच्या रुपाने दिसून येते .या काळात स्वराज्य अगदी सहजासहजी उभे राहिले असे नाही .यामागे खूप मोठा त्याग, संघर्ष व बलिदानाचा भाग आहे .स्वराज्यसंकल्पणा व प्रेरणा ही शहाजीराजे व जिजाऊ माँसाहेब यांच्या रूपाने मिळाली .छत्रपती शिवरांयांनी आपली बुध्दी,साहस,धैर्य,अखंड सावधानता या जोरावर अगणित सर्व जाती धर्माच्या विश्वासु मावळ्यांच्या बलिदानावर अखंड परिश्रमातून स्वराज्य उभं राहिलं होतं.याचीच फलश्रृती म्हणजे ६ जून १६७४ चा तो स्वांतत्र्य दिवस !
मध्ययुगीन काळातील रयतेचा रयतोत्सव ! त्या काळातील रंजल्या गाजंल्या प्रजेचा सुवर्णक्षण !,
नव्हे तर ! पहिला स्वांतत्र्यदिवसच !
' *प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।*
(अर्थ - शहाजींचा पुत्र जो शिवाजी, त्यांची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.)
सहस्त्रकरविक्रम म्हणून ज्यांची संपूर्ण भारतात ख्याती होती असे महाबली शहाजीराजे यांनी ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजासाठी त्यांच्या बालपणीच तयार करुन घेतली होती .मातब्बर विश्वासु सरदार तथा अमात्यासह जिजाऊ -शिवबांना पुण्याच्या जहागिरीवर ठेवून त्याच वेळेस ही राजमुद्रा व भगवा ध्वज त्यांना दिला होता .या राजमुद्रेच्या अर्थावरुनच कळते की महाबली शहाजी राजे व जिजाऊ मॉसाहेब यांचा आत्मविश्वास किती दृढ होता .सोबत दिलेला स्वतंत्र राज्यासाठीचा भगवा ध्वजही तेवढाच महत्वाचा होता .अटकेपार मराठा साम्राज्याचा ध्वज फडकविण्याची ही पायाभरणीच होती .पुढे ती राज्यभिषेकाच्या रूपाने अधिक मजबूत झाली .
बहुतेक लक्षणांनी युक्त असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या साक्षीने हा रयतेचा स्वांतत्र्यत्सोवासाठी संपूर्ण स्वराज्य सज्ज झालं होत .घरा-घरात आनंदी व समाधानाचे वातावरण तयार झाले .रयतेच्या डोळ्यात आनंद्राश्रु डबडबून वाहत होते असा हा अत्याधिक आनंदाचा सुवर्णक्षण रयतेसाठी होता .मापातही बसणार नाही येवढा ,तेवढा ही म्हणता येणार नाही येवढा आनंदी क्षण तो होता . विविध इतिहासकारांनी आपआपल्या शैलीत या सुवर्णक्षणाचे वर्णन केलेले आहे.
रायगडावर अठरा कारखाण्याची स्थळे ,प्रधान ,मंत्री यासाठी बांधलेली घरे,हजारो माणसे बसतील येवढे सिहासनासाठी बांधलेले सभागृह ही रचना या दुर्गेश्वरावर गादी स्थापण्याचा इरादा महाराजांचा मुळापासूनचा होता . *विवेकसभा,न्यायस्सभा,प्रगट सभा (जेथे गोरगरीबांच्या फिर्यादी ऐकल्या जातात )प्रबोधसभा रत्नगारसभा ,नितीसभा (परकीय आदरसत्कार व भेटी स्थळ)* अंर्तगृहे,देवागारे,भोजनगृहे इत्यादी जागा निश्चित करने रयतेच्या कल्याणाची नांदीच होती .संपूर्ण रायगड हा पताका, तोरणे,दिवाबत्तीने सजला होता.स्वराज्यातील प्रत्येक किल्यास अशी सूचना केली होती की,एका किल्यावरचा तोफेच्या सलामीचा आवाज जाताच दुसऱ्या किल्यावर तोफेची सरबत्ती केली जावी म्हणजे एका क्षणात संपूर्ण स्वराज्य हा अपूर्व सोहळा घराघरात अनुभवनार होते .
मागील दशकात आग्रा येथील औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांनी जो स्वाभिमान व बाणेदारपणा दाखवून संपूर्ण जगाला एकप्रकारे तेथून संदेशच दिला होता . लाखाच्या सैन्यातून बुद्धी व साहसाने सुखरूपपणे स्वराज्यात येऊन राज्याभिषेक ही गोष्ट काही सामान्य नव्हती .
हे छत्रपतींनी औरंगजेबास दिलेले उत्तरच होते .त्या काळातील मान्यतेनुसार शांस्त्रविधिप्रमाणे राज्यभिषेकने छत्रसिहासनादि राजचिन्हे धारण करुन शिवराय सिहासनाधिश्वर छत्रपती होऊन रयतेला लोककल्याणकारी असा आपला राजा शेकडो वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मिळणार होतां.असा हा सोहळा होता .
अष्टप्रधानमंडळाची रचना,कालगणनेसाठी " *राज्यभिषेक शक* " राज्यव्यवहार कोष निर्मिती,सोन्याची व तांब्याची *शिवराई* ही रयतेच्या स्वराज्यांची एका सार्वभौम राज्यांची नांदी होती .शिवराय शककर्ते झाले .या मातीला स्वतःची ओळख निर्माण करुन दिले .मातृभूमिच्या रक्षणार्थ या सोहळ्यातून स्वाभिमान निर्माण झाला .अन्याय ,अत्याचाराविरूध्द लढण्याची प्रेरणा निर्माण झाली .अठरापरगड जातीची धर्माची स्वराज्य डौलाने उभे राहीले .सहयाद्रीच्या शिखरा -शिखरावर भगवा फडकू लागला .शेतकरी ,कष्टकऱ्यांचे राज्य आले या समाधानाने रयत नांदू लागली.
याची प्रचीती पुढे *५ सप्टेबर १६७४ च्या अनंत सुबेदारास मामले प्रभावळीस लिहलेल्या पत्रावरून* कळते .हे पत्र राज्यभिषेकानंतरच्या दुसऱ्याच महिण्यानंतरचे आहे .या पत्राचा भावार्थ आपण लक्षात घेतला तर असे दिसते की , *वतनदाराच्या* भ्रष्टाचाराला शिवरायांनी पायबंध घातला ." *प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये* ." बळीराजाचा खऱ्या अर्थाने सन्मान झालेला या पत्रातून कळते .ज्याला *कसायला शेत नसेल त्याला शेत द्यावे* .बैल व इतर साधने पुरवावी .माणुसबळ असेल त्याला शेतीसाठी -बैल - नागर आणि पोटासाठी धान्यासाठी *रोख पैसेही द्यावे* व शेती करण्यास प्रोत्साहन द्यावे .पुढे दोन वर्षानी पीक आल्यावर त्याच्याकडून बैल ,धान्यादिचे पैसे वाढी -दिढी न करता हळूहळू वसूल करावे ." *फक्त मुद्दलच वसूल करावे ,त्यांना सन्मानाने वागवावे*.'' हे महत्वाचे .शेतकऱ्यांच्या *व्याज व दिढी* वर प्रतिबंध घालणारे पहिले छत्रपती म्हणजे शिवराय .
" *शेतकऱ्यासाठी दोन लाख होन खर्च करावा* "
त्या काळात *५४* सुभे होते .एका सुभ्यासाठी दोन लाख होन खर्च करावा म्हणजे ही रककम *१०८ लक्ष होन* होते .एक होन म्हणजे *३ ग्रैम सोने* होय .आजच्या भावात एक होन म्हणजे *१५०००* पर्यन्त होतो .म्हणजे शेतकऱ्यासाठी केवढी मोठी रक्कम छत्रपतीच्या काळात केली जायची हे दिसून येते. *कुणब्या -कुणब्याची खबर घेऊन त्याला सामर्थ्य द्या* .पडीत जमीन लागवडी खाली आणली तर राज्याच्या खजीन्यात तुम्ही भर टाकली असे आम्ही समजू. पत्राच्या शेवटी '' *कुणबी जगला तरच देश जगेल*" असे शिवराय म्हणतात. *शिवरायांचा शेतकरी हा अठरापरगड जाती ,धर्मात विभागलेला होता* .सर्वासाठी एकच न्याय देणारे छत्रपती होते .
असे रयतेसाठी कल्याणकारी ठरणारे अनेक निर्णय शिवचरित्रात दिसून येतात .राज्यभिषेकाच्या रुपाने लाभणारे स्थैर्य,सार्वभौमत्व त्याकाळानुसार अलौकिकच होते .समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देणारा हा सुवर्ण काळ ठरला .म्हणूनच *शककर्ते* शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काळातील *स्वातंत्र्यदिवसच* होय .
उत्सव स्वातंत्र्याचा......
उत्सव सार्वभौमत्वाचा.....
उत्सव पराक्रमांचा.......
उत्सव नीतीमत्तेचा.....
उत्सव मावळ्यांच्या पराक्रमांचा........
उत्सव रयतेचा.....
उत्सव शिव -शंभू गौरवाचा......
उत्सव मॉसाहेबांच्या विचारांचा.....
उत्सव शहाजीराजांच्या संकल्पनेचा.....
आज संपूर्ण महाराष्ट्र या शिवराज्यभिषेक दिनी उत्साहाने अभिव्यव्यक्त होतांना दिसत आहे.
या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या महावीरांना शतःश: नमन करतो .त्याच्यामुळेच या सुवर्णक्षणाचा साक्षीदार सह्याद्री झाला .
शिवराज्यभिषेकदिनाच्या हार्दिक शिवशुभेच्छा !
*जय शिवराय*
*संजय खांडवे*
9011971122

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा