छत्रपती राजाराम महाराज
🚩🚩🚩🚩🚩🚩
तीन पिढयांची अखंड मेहनत,पारिश्रम ,शौर्य,धाडस,त्याग,पराक्रम,विश्वास,प्रजाहितक्षता याच्या जोरावर आदर्श घेत मराठयांचे साम्राज्य मोठया आत्मविश्वासाने पराक्रम गाजवत होते.
आईजिजाऊंच्या प्रेरणेतून साकार झालेले....
महाबलीनी सूचीत केलेले स्वराज्याचे स्वप्न 'सनय 'होऊन शिवरायांनी उभे केले होते.
शिवरायांचा विश्वास ,मॉसाहेबांचीप्रेरणा ही रयतेला स्वराज्यरक्षणार्थ सिद्ध करत होती सोबत तुकोबारायांचे अभंग मावळ्यासांठी प्रेरणा देत होते.लाखाच्या पोशिदयाला जपण्यासाठी प्रत्येक मावळा निधड्या छातीने पुढ येत होता
आबासाहेबानंतरही स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा महाराष्ट्राच्या रक्तात भिनली ,अन्यायाविरुध्दची प्रेरणा आबासाहेव देऊन गेले ,स्वराज्यरक्षकाची भूमिका पुढे शंभूराजांनी बलिदान देऊन पूर्णत्वास नेली,आपले प्राण दिले पण स्वाभिमान सोडला नाही,महाराजांनी उभी केलेली गडकोट ही औंरंगजेबाविरुद्ध लढत ठेवा हा संदेश शंभूराजांनी दिला ही रयतेची कळवळ त्यात होती एकदा हातून गेलेले स्वराज्य पुन्हा उभे करणे हे अवघड काम होईल !
आबासाहेब,मॉसाहेबांच्या तालमित वाढलेली येसूराणीसाहेबांनी धीरगंभीरपणे ही जबाबदारी स्वीकारली,हा भोसले घराण्याचा संस्कार ......
शंभूराजांनी दिलेली बिरूदावली " श्री सखी राज्ञी जयति ।"
आपल्या पतीच्या पश्चात स्वराज्याची सूत्र सांभाळण्याचा संस्कृतीचा वारसा त्यांना मिळाला अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम,महाबली शहाजीराजे व स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांच्याकडूनच........
महाबली शहाजीराजांच्या दक्षिणेतील शिवरायांच्या जडणघडणीतील एक भाग म्हणजे शिवरायांचे सनय होणे ,म्हणजे विविधअंगी ज्ञान प्राप्त करणे. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांनी जिंजी जिंकला त्या जिजींचे अधिकचे बांधकाम करून अभेदय केले,त्याठीकाणी महाडीकांची नेमणुक केली जिंजी अधिक मजबुत केला ,हा शिवचरित्रातील सनयाचाच एक भाग आहे,याची प्रचीती पुढे येते. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर फार मोठे संकट कोसळले या संकटाला मोठया धैर्याने तोंड देत स्वराज्याचे मनोधैर्य वाढविण्याचे काम महाराणी येसूबाईंनी केले .संभाजीराजे मुघलांच्या कैदेत पडल्यावर सुटकेची काही आशा नव्हती काळाचा वेध घेत येसूराणीसाहेबांनी छत्रपती राजारामांचे मंचकरोहन ९ फेब्रुवारी १६८९ ला रायगडावर केले . त्यावेळी शंभूपुत्र शाहूराजे केवळ ७ वर्षाचे होते आणि राजाराम राजे हे १९ वर्षाचे होते . वेढा घालण्याचे धाडस मोगलांना शंभूराजे गेल्यानंतरच झाले .२५मार्च १६८९ ला औरंगजेबाचा वजीर असदखान याचा मुलगा इतिकादखान हा औंरगजेबाचा मावसभाऊ याने रायगडला वेढा दिला .येसूराणीसाहेबांच्या मसलतीनुसार राजारामराजे यांना ५ एप्रिल १६८९ ला ताराराणी ,राजसबाई यांच्यासह प्रल्हाद निराजी,धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांच्यासह गुप्तपणे रायगड सोडला.जावळी _प्रतापगड _पन्हाळगड मार्गाने अत्यंत शिताफीने जिंजीकडे प्रयान सुरु केले .मराठयांचा हा राजा हुल देवून कर्नाटकात जाईल हा अंदाज मोगली सैन्याला होता . पन्हाळ्याकडे येतांना प्रतापगडाच्या पायथ्याशीही लढाई झाली ती अज्ञात आहे. त्यामुळे या मार्गावर मोगलांनी आपले चौकी पहारे अधिक सक्त केले होते .मोगली सैन्य वेगाने दक्षिणेत एकवटायला सुरुवात झाली होती.मराठे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करत मोगली सैन्यावर छापे घालत होते .अंधाऱ्या रात्री औरंगजेबाच्या छावणीवर गनिमी काव्याने हल्ला करून त्या लाखाच्या सैन्यातून त्याच्या छावणीचा कळस कापून आणला . संभाजी राजे यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा हा हल्ला होता . या अतुलनिय पराक्रमावर रामचंद्रपंत अमात्य म्हणतात " बादशहाचे डेऱ्याचे कळसच आणून झुलफिकारखान याचे पाच हत्ती आणिले त्यापेक्षा यांची (संताजीची) मर्दुनकी कोठवर वर्णावी "
दुसऱ्या बाजूने धनाजी जाधव रणमस्तखान व शहाबुध्दीन खानाच्या सैन्यास शह देत होत्या .संताजी -धनाजींच्या पराक्रमाने मराठयांमधे एक नवचैतन्य संचारले होते .राजाराम महाराजांनी कर्नाटकाच्या प्रवासास निघण्या अगोदर स्वराज्याची जबाबदारी सचीव रामचंद्रपंत यांच्याकडे सोपविला त्यांच्या सेवेत शंकरजी नारायण यांना ठेवले .संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे नरवीर नाशिक ते जिंजी पर्यन्तचा प्रान्त लढवत ठेवण्याचे नियोजन केले .सहयाद्रीच्या मदतीने मराठे एक एक किल्ला लढवत ठेवून मोगलांना चकमा देत होते .राजारामराजे पन्हाळ्याच्या वेढयात असतांना तो वेढा मोगलांनी अधिक कडक केला अशा परिस्थितीत सुद्धा २६ सप्टेंबर १६८९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजाराम महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह पन्हाळगड सोडला.शत्रूला याची भनक सुद्धा लागली नाही .आग्रावरून सुटकेच्या वेळी जे तंत्र शिवरायांनी वापरले त्याच पध्दतीने राजाराम महाराजांनी अत्यंत शिताफीने आपल्या बुद्धीचार्तुर्याने हा प्रवास जिंजीपर्यन्त केला .येथून महाराजांचा जिंजीचा प्रवास सुरू झाला . या प्रवासावर केशव पंडितांनी एक छोटेखानी काव्याची रचना केली आहे. या प्रवासावर आणि स्वराज्याची दक्षिणेतील राजधानी अत्यंत चातुर्याने ,पराक्रमाने व मुत्सदी युद्ध नितीने राजारामराजेंनी टिकवून ठेवली यात तंजावरच्या मराठा साम्राज्याचीही त्यांना खूप मोठी मदत झाली .प्रवासात बेदनूरच्या राणी चन्नमा हिने राजधर्म पाळत मराठयांच्या राजाचे रक्षण केले . यामुळे रागाने राणीवर चालून आलेल्या सैन्यास संताजी घोरपडेनी हतबल करुन परत पाठवले.तुंगभद्रानदीतील बेटावर राजारामराजे मुककामास असतांना अब्दुल्लाखानाच्या हल्यात महाराजांनी वेषपरावर्तन करून सुटका केली त्यावेळी राजवस्त्र परिधान करून मीच राजारामराजे आहे हे छातीठोक पणे सांगत आपल्या मराठयांच्या राजासाठी आत्मबलिदान दिले .या अनामिक वीर मावळ्यांचे नाव इतिहासाला ज्ञात नाही.हा वीर म्हणजे स्वराज्याचा दुसरा शिवाजी काशिदच म्हणावे लागेल .हा जिंजीचा प्रवास अत्यंत संक्षिप्त आहे यावर अधिक लिखान होणे आवश्यक आहे.त्यांनंतर जिंजी व त्या परिसरातील छत्रपती राजारामराजे यांच्या पराक्रमाची गाथा घरा-घरात पोहचणेही तितकेच महत्वाचे !
स्वराज्याचे छत्रपती राजाराम महाराज यांनी ही स्वराज्याची राजधानी लढत ठेवली . मराठयांनी त्यांच्या नेतृत्वात औरंगजेबास हैरान करून सोडले ७ वर्ष मुघलांचा वेढा होता ,मुघल झुंजत राहीले पण गडावरची रसद संपली नाही. राजाराम महाराजांनी हा लढा सुरू ठेवला ही त्यांची युध्दनिती होती यावर आता अभ्यास होतांना दिसत आहे.हे शहाजीराजे आणि शिवरायांचे दुरदृष्टीचे नियोजन होते . रायगड जर धोक्यात आला तर ही महाराजांची पर्यायी योजना शिवचरित्रातून दिसते हेच शिवतंत्र आहे .
आज छत्रपती राजाराम महाराजांची जयंती या निमित्ताने स्वराज्याचे तिसरे छत्रपती यांना मानाचा मुजरा!
- संजय खांडवे
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा