बुधवार, १४ मे, २०२५

पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज*

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज*


                *- संजय खांडवे*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 छत्रपती संभाजी महाराजांच्या घोडदळ आणि पायदळाने  गोवा प्रांतामध्ये घुसून  आक्रमणाला सुरुवात केली होती यात त्यांनी चौल ,वसई ,दमण वगैरे पोर्तुगीजांची ठाणे घेतली आणि चौलचा वेढा मजबूत केला . साष्टी व बारदेश प्रांतासह ' सा इश्तेव्हाव' ( सेन्ट स्टिफन उर्फ जुवे ) या बेटात शिरले  . ओहटीच्या वेळी या बेटावर पायवाटेने जाता येत असे . कमी शिबंदी व शत्रुच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन मोठ्या शिताफीने या बेटावरील किल्ला घेतला . एका फ्रेंच प्रवाश्याने आपल्या वर्णनात म्हटले आहे की हा किल्ला पाहून संभाजी राजांनी त्याचे दगड व इतर सामान नेऊन फोंडे येथे मर्दनगड किल्ला बांधला . संभाजी राजांनी जुवे बेट घेतल्याची बातमी अगदी वाऱ्याच्या वेगाने गोव्यात पसरली . हे बेट गोव्याला लागून असल्याने मराठे केव्हाही हल्ला करतील म्हणून 

 छत्रपती संभाजी महाराजांचे घोडदळ आणि पायदळ हे गोवा प्रांतामध्ये घुसून  आक्रमणाला सुरुवात केली होती यात त्यांनी चौल ,वसई ,दमण वगैरे पोर्तुगीतांची ठाणे घेतली आणि चौलचा वेढा मजबूत केला . साष्टी व बारदेश प्रांतासह ' सा इश्तेव्हाव' ( सेन्ट स्टिफन उर्फ जुवे ) या बेटात शिरला  . ओहटीच्या वेळी या बेटावर पायवाटेने जाता येत असे . कमी शिबंदी व शत्रुच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन मोठ्या शिताफीने या बेटावरील किल्ला घेतला . एका फ्रेंच प्रवाश्याने आपल्या वर्णनात म्हटले आहे की हा किल्ला पाहून संभाजी राजांनी त्याचे दगड व इतर सामान नेऊन फोंडे येथे मर्दनगड किल्ला बांधला . संभाजी राजांनी जुवे बेट घेतल्याची बातमी अगदी वाऱ्याच्या वेगाने गोव्यात पसरली . हे बेट गोव्याला लागून असल्याने मराठे केव्हाही हल्ला करतील म्हणून व्हिसेरेईने बंदोबस्त वाढवून मराठ्यांना जुवे बेटावरून हुसकाऊन लावण्यासाठी २५ नोव्हे .१६८३ ला ४०० लोकासह स्वतः बेटावर उतरला  .  त्याला कुणीच विरोध केला नाही तो थेट सेन्ट स्टिफन च्या चर्च पर्यन्त गेला . जनरल रुद्रिगु द काश्त याने येथूनच तोफा डागण्याचा सल्ला दिला पण त्याने तो ऐकला नाही मराठ्यांची पुढे ८०० शिबंदी होती . व्हिसेरेईने मराठ्यावर हल्ला चढविला . तोफांचा मारा सुरु झाला हे पाहून मराठ्यांनी पळ काढायला सुरुवात केली होती पण त्याच क्षणी मराठ्यांना ३०० घोडेस्वारांची कुमक मिळाली हे पाहताच व्हिसेरेईने आपल्या सैन्यास माघार घेण्याची सूचना देता न देता  त्याच्या सैन्याने पळ काढायला सुरु केली त्याची इच्छा असतांनाही तो रोखू शकला नाही .येवढी धास्ती मराठ्यांची बसलेली होती . या घोडेस्वारांनी व्हिसेरेईसह पोर्तुगीजांचा आपल्या नंग्या तलवारी घेऊन पाठलाग सुरु केला . यात दिडशे पोर्तुगीज सैनिक मारले गेले अनेक जखमी झाले त्यापैकी चार घोडेस्वारांनी व्हिसेरेईचा पाठलाग सुरुच ठेवला होता त्याने बंदुकीने दोन घोडेस्वारांना मारले नंतर त्याने दुसरे जोडनळीचे पिस्तुल काढून एकाच वेळी चाप दोन्ही चाप ओढल्या गेल्याने एका घोडेस्वारास गोळी लागून तो जखमी झाला . आता व्हिसेरेई  जवळ केवळ तलवार उरली होती त्यालासुद्धा गोळी लागून तो जखमी झाला होता . त्याचा घोडाही मराठ्यांच्या ताब्यात आला होता .  जुवे बेटावर पोर्तुगीज सैनिक आले त्यावेळी ओहटी होती आता नदी किनाऱ्यावर पोहचल्यावर मात्र भरती आल्याने त्यांच्या बोटी मधेच पाण्यावर तरंगत होत्या . पाठलाग सुरु असल्याने ओहटी येईपर्यन्त थांबणे शक्य नसल्याने बोटी पर्यन्त पोहत जाणे आवश्यक होते . अनेकांनी पाण्यात उड्या घेतल्या ज्यांना पोहता येत होते ते पोहचले मात्र पोहता न येणारे मात्र बुडून मेले . काही दलदलीत अडकले त्यांना मराठ्यांनी कापून काढले . व्हिसेरेई व जनरल रुद्रुगु द काश्त मोठ्या प्रयत्नाने बोटी पर्यन्त पोहचते झाले . पोर्तुगीजांची शोकांतिका बघण्यासाठी जुवे बेटावरील अनेक नागरीक किनार्‍यावर गर्दी करून जमले होते . पलिकडच्या बाजूला गोवा शहरातील लोकांनाही ती दिसत होती . मराठ्यांच्या इतिहासातील गोवा प्रांतात आपला वचक बसविणारा हा मोठा प्रसंग होता. विशेष म्हणजे या पोर्तुकिजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज जातीने हा पाठलाग करत होते. संभाजी महाराज येवढे बेभान झाले होते की व्हिसेरेईची नदीत पुढ गेलेल्या नौकेचा पाठलाग करतांना अगदी दूर पर्यन्त स्वतः घोडयासह पाण्यात उतरले . खंडो बल्लाळ चिटणिस यांनी प्रसंगवधान साधत महाराजांच्या घोडयाचा लगाम पकडून घोडा थांबविला नाही तर काहीही होऊ शकले असते . हा प्रसंग गोवेकरांनी जीवंत पाहीला त्यामुळे संभाजी राजे यांच्या पराक्रमाची प्रचीती त्यांना आली .

     जुवे बेटात पोर्तुगीजांची वाताहत झाल्याची बातमी पसरली यात व्हिसेरेई आणि जनरल रुद्रिगु दि काश्त हे दोघेही ठार झाले म्हणून नागरीकांनी ' जेरेनिमु द मेंदोसा ' याची गव्हर्नर म्हणून नेमणुकीची घोषणा करण्याची तयारी केली होती पण अचानक व्हिसेरेई जीवंत परत आल्याने घोषणा टळली .  महाराज साहेबा प्रमाणेच संभाजीराजे देखील स्वराज्याचे शत्रू ओळखून होते फिरंगी टोपीकरांबरोबरच पोर्तुगीज , डज देखील पुढ्च्या काळात आपल्या भूमिस विळखा घालून गुलाम करतील याचे पूर्वानुमान त्यांना होते .  मोगला सोबतच या परकियांना देखील लगाम घातला गेला पाहिजे हे स्वराज्यांच्या छत्रपतींचे धोरण होते .


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*संदर्भ : पोर्तुगीज -मराठा संबंध*

          *स .श. देसाई*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...