![]() |
| अलिकडील टेकडीवर भव्य दगडात पायऱ्या कोरलेल्या दिसतात जणूकाही हा हा एका मोठ्या खोलीचा पाया असावा असे दिसते |
![]() |
| ।कातरलेला दगड मंदिराकडे जाताना लागतो |
![]() |
| पठारावरुन दिसणारे कालिंका देवी मंदीर |
![]() |
| अजिंठा डोंगररांग |

➖➖➖➖➖➖➖
सर्व देवामधे श्रेष्ठ......
मस्तकी चंद्र धारण केलेला........
सर्व लोकांचा एकच अधिपती.........
देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....
असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '
महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आढळतात बरीच मंदिरे ही यादवकालिन आहेत .असेच एक प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम अविष्कार असलेले मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे .जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .
मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .
तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे साहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .
उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो .आत गेल्यावर त्या मंडपात अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला होतोच.
या मंदीराला ५० गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे .ताराकृती उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण साहे .मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते .मध्यम नवतालातील यक्ष ,अप्सरा,प्राणी,पक्षी यांची शिल्पे आढळतात .उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो .दुरुस्तीचे काम सुरू दिसते पण पर्याप्त वाटत नाही .एवढा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे .त्या पाठीमागचा इ|तिहास समोर आला पाहीजे .त्या भव्य दिव्यतेची व आपल्या पूर्वजाच्या अपार मेहणतीमधून साकारलेली जागतिक दर्जाची संस्कृती जगासमोर गेली पाहीजे या उद्देशाने आमची निर्सग-इतिहास प्रेमी टिम सतत नवनवीन ठिकाणी भटकत असते .यावेळी लोकमत बुलढाणाचे उपसंपादक तथा शिल्प अभ्यासक विवेक चांदुरकर सर ,इतिहास अभ्यासक प्रा पी जी सवडतकर सर व किशोर वाघ सर (अनिस मराठवाडा प्रदेशध्यक्ष) आमच्या सोबत होते .
संजय खांडवे
बुलढाणा
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात दुर्ग निरूपणामध्ये दुर्गाचे महत्व विषद करत त्यांनी मांडलेले बारकावे हे आजच्या हजारो अभियंत्यानी व शास्त्रज्ञानी एकत्रीत येऊन मांडणी करता येणार नाही ती केवळ एकटया शंभूराजेंनी केलेली दिसते. यामध्ये या दुर्ग निरुपमातील प्रत्येक श्लोकातील शब्द अन शब्द बरेच काही सांगून जातो . एका झुंजार योध्यातील अपूर्व वास्तुविशारदता की जी शास्त्राच्या कसोटीवर टिकते ,यातील बारकावे हे सटीकतेने अभेद्यता वाढवितांना दिसतात .एक दुर्ग आपल्या राज्यासाठी कश्या पद्धतीने सज्ज असावा याचे भाष्य करताना संभाजीराजे म्हणतात -
दुर्गावर एकाच वेळी १०० च्या वर लोकांचा नाश करणारी यंत्रे दुर्गावर असावी शेकडो यंत्रानी तो दुर्ग सगळीकडून सज्ज असावा .राजाने या किल्याच्या मधोमध संपूर्ण साधनांनी युक्त असा ,सर्व बाजूनी काळजीपूर्वक विचार करुन विविध आयुधे,सुरक्षितते साठी गुप्त असा ,सर्व ॠतुमध्ये फळे ,फुले ,वृक्ष व जल देणारा शुभ्र असा राजवाडा तयार करावा.असा राजवाडा हा किती सुरक्षित असेल याची आपण कल्पना करू शकतो .अश्या देश कोश आदि सर्व साधने व वस्तु याच्या योगाने सुरक्षित झालेल्या उत्तम,स्वच्छ ,निर्मल,शुभ्र गुणांनी युक्त अर्थात पवित्र नगरात ,राजकीय चिन्हे संपन्न अश्या राजमंदिरात राजाने वास करावा.
दुर्गामध्ये लांबलचक आयाताकार रांगा तयार कराव्यात .त्यापैकी एका पत्किंच्या टोकास चौथऱ्यावर प्रार्थनास्थळ असावे .दुसऱ्या रांगेच्या चौथऱ्यावर राजाचे राहण्याचे ठिकाण निर्माण करावे .तिसऱ्या चौथऱ्यावर धर्माध्यक्षाचे स्थान असावे .चौथ्या चौथऱ्यावर अग्रभागी गोपुरांची रचना करावी .अश्या स्वरूपाची चौरस, आयताकृती किंवा गोलाकार अशी तीन प्रकारची नगरचना करून घ्यावी असे संभाजी राजे सांगतात .
*अर्धचंद्रप्रकारं च वज्रकारं च कारयेत्*
शेवटी त्रिकोन यामधे याप्रमाने अर्धचंद्राकार किंवा वज्र आकाराची रचना करावी .
राजवाडयाच्या दक्षिण दिशेला कोशागार करणे योग्य आहे व त्या कोशागाराच्या दक्षिण भागात गजशाळा म्हणजे हत्तीशाळा असावी .धनरक्षणाची ही रीत प्रशंसनिय आहे .अशी रचना ही संभाजी राजे यांच्या दुरदृष्टी व वास्तु विशारद असल्याचाच भाग म्हणावा लागेल .
दुर्गावरील यज्ञशाळेचे मुख हे गजशाळेच्या पूर्वेस किंवा उत्तरेस करावे .दक्षिणपूर्वमध्य म्हणजे आग्नेय दिशेला आयुधागार बनविणे योग्य आणि तेथेच शेजारी रथ,शकटशास्त्र,धर्मज्ञ व दुसऱ्या कर्मशाळा असाव्यात .थोडक्यात या दिशेला सर्व औद्योगिक विभाग असावा .पुरोहीताचे घर राजवाड्याच्या डाव्या बाजूला करावे त्या भागात मंत्री ,ज्योतिषशास्त्र वेत्ता आणि राजवैदयाचे निवासस्थान असावे .महाभागांची निवासस्थानेही तयार करावीत .गाईचे गोठे,द्योडयाच्या पागा तयार कराव्यात .अश्वशाळा उत्तराभिमुखी असावी .राजाने अश्व रात्रभर नजरेखाली ठेवावेत व त्या अश्व शाळेत कोंबडे ,वानर,ठेवावीत .
गाई,हत्ती,घोडे इ.च्या मलाचे उत्सर्जन,देवदैवादिक कृत्ये सूर्य मावळल्यानंतर करू नये असे संकेत दुर्ग निरूपणात संभाजी राजे देतात .
योद्धे,शिल्पशास्त्रज्ञ अशा सर्वांना उत्तर घरे द्यावीत आणि मंत्रविदयाजाणकार व ज्योतिषांना तसेच घरे द्यावी .किल्यामधे मोठमोठे रोग उद्भवतात .राजाने गाई ,घोडे,हत्ती यांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व रोगस्वरूप त्यांचे परिणाम यांचा सर्व अंदाज व्यक्त करून त्यावरील औषधांचे जाणकार वैद्याना किल्यात राहण्यास जागा द्यावी .कुशल शीलवान ब्राम्हणांना दुर्गामध्ये स्थान असावे पण काही काम नसलेल्यांनी तेथे गर्दी करू नये .असे संभाजी राजे सांगतात .बुधभूषण या ग्रंथाच्या द्वितिय अध्यायातील दुर्ग निरुपणातील या बाबी संभाजीराजे एक कुशल योद्धा,सर्वश्रेष्ठ युवराज,थोर साहित्यीक,विचारवंत,तत्ववेत्ता त्याचबरोबर वास्तुज्ञास्त्र विशारद असल्याचेही स्पष्ट होते .दुर्गशास्त्राचे असलेले ज्ञान व त्यांनी केलेली बुधभूषण मधील दुर्गाविषयीची संपूर्ण मांडणी याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडणी केल्यास अधिक स्पष्टता येईल.
संदर्भ
बुधभूषण
संजय खांडवे
🚩🚩🚩🚩🚩🚩
स्वराज्याच्या आणाभाका घेत स्वराज्य वाढू लागले ,असंख्य किल्ले स्वराज्यात शिवरायांच्या बुद्धीचातुर्य,शौर्य,धाडस व किर्तीने येऊ लागले यासाठी स्वराज्याच्या आड येणाऱ्या स्वकियांचाही बंदोबस्त शिवरायांना करावा लागला .जावळीचा विजय हा त्यातलाच एक भाग होता .या विजयाने कोयने पासून लांब कोकणपर्यन्त स्वराज्य विस्तारले ,नव्हे दुप्पटच झाले .
जावळी च्या दाट किर्र अश्या खोऱ्यात ,अरुंद वाटा,डोंगर दऱ्या हया जंगली श्वापदांचा वावर असलेली अशी होती .जावळी जनू वाघाची जाळीच !हयाच ठिकाणी शिवरायांच्या बुध्दीचार्तुयाचा एक भाग म्हणजे महाराजांचे पुर्वानुमान कौशल्य येथे दिसून येते .पुर्वानुमान म्हणजे पुढे काय होणार किंवा परिस्थिती कशी असणार हे आपल्या बुध्दीपटलावर घासून अनुमान काढणे होय.
महाराजांनी याच ठिकाणचा भोरप्या डोंगर हेरला .त्याचा आकार, रचना ,दगड व पाणी याचा अभ्यास करून मोरोपंताना या ठिकाणी गड बांधण्याचा आदेश दिला .स्वराज्यातील स्थापत्यशास्त्र विशारद अर्जेाजी यादव यांनी हा अभेद्य असा प्रतापगड १६५६ साली बांधून काढला .स्वराज्याचा भगवा ध्वज प्रतापगडावर डौलाने फडकू लागला .हाच प्रतापगड जेव्हा स्वराज्यावर अफजल खानाचे संकट आले तेव्हा स्वराज्य रक्षणासाठी सिद्ध झाला .रडतुडीच्या घाटातून खानाला बोलावून याच जावळीच्या भागात प्रतापगडाच्या साक्षीने त्याच्या चरणी अफजलखान रूपी स्वराज्यावरील संकट संपविले.हे आजही त्या खानाची कबर गडावरून पाहतांना लक्षात येते.
या मोहिमेंत महाराजांचे शौर्य तर दिसतेच त्याचबरोबर अलौकिक बुद्धीमत्तेचेही दर्शन घडते . शञूलाही चक्राउन सोडणारी युद्धाची व्यूहरचना त्याच सोबत विश्वासू जीवाला जीव देणारे शूर स्वराज्याचे मावळे .
*"आम्ही तर जीवीत तृणप्राय समजून शत्रुच्या अंगावर चालून जात आहो.यात यश आले तर ठिकच आहे ;परंतु काही भलताच प्रकार घडला तर तुम्ही घाबरुन जाऊ नका .ठरविलेल्या बेताप्रमाने शत्रुवर चालून जाऊन त्याचा मोड करा व राज्याचे रक्षण करा .तुम्ही सर्व शूर व पराक्रमी आहा .आमची सगळी मदार तुमच्यावर आहे .तुमच्यासारखे इमानी व विर्यशाली पुरुष सहाय्य आहैत म्हणून आम्हास यवनांची पर्वा वाटत नाही .या समयी सर्वाना आपआपल्या शौर्याची व पराक्रमाची पराकाष्टा करावी .तुमची अनुकुलता आहे म्हणून मला अफझुलखानाचा मुळीच हिशोब वाटत नाही .आजपर्यन्त केलेली कमाई आपल्या सहकार्याचे व शौर्याचे फळ आहे .ती आपली कमाई कायम राखण्यास जिवाची पर्वा न करता ह्या कठीण प्रसंगी झटाल तर तुमची किर्ती अधिकच वाढेल ! हे असे वीर्योत्सहाचे उद्दीपन करणारे भाषण ऐकूण सर्व लोकांच्या अंगात स्फुरण आले. ते म्हणाले " आपण आम्हास जी जी आज्ञा कराल तदनुसार वागण्यात आम्ही यत्किंचितही कसूर करणार नाही .त्यासाठी आमचे प्राणही बळी पडले तरी त्याची आम्हाला क्षिती नाही .हे प्राण आपल्या चरणी एकवार वाहिले आहेत .ते आता आमचे नव्हेत ते स्वामिकार्यी गत झाले तर ते आम्ही मोठे भूषण समजू ."*
(कृष्णराव केळूसकर गुरुजी लिखित शिवचरीत्रातून )
सामाजिक स्वांतत्र्य साठी प्रत्यक्ष हातात तलवार घेऊन आपल्या जीवाची पर्वा न करता मोहीमेत उतरणारे पहीले राजे म्हणजे शिवराय .
या मोहीमेत महाराजांनी असंख्य बारकावे अवलंबविले ते आपण पुढे यथावकाश अभ्यासूच !
आज वीर जीवाजी महाले यांची जयंती या निमित्ताने जीवाजी महाले यांच्या स्मृतीस प्रणाम करतो
शिवाजी महाराजांनी या मोहीमेंत अंगरक्षक म्हणून दहा मावळ्याना सोबत घेतले .प्रत्येकाला प्रत्येकाचे काम नेमुण दिले ,महाराजांच्या गुप्तहेर खात्यानुसार शञूचे अनेक बारकावे अभ्यासून त्याच्या तोडीस तोड व्यूहरचना करणे हे ही महाराजांची युद्धनितीच होती .
🚩
*तथैव माहिलो जीवो विश्वजिच्च मुरुबक:।*
🚩
या आशयाचा श्लोक महाराजांच्या समकालिन असलेल्या "शिवभारत "या ग्रंथात २१व्या अध्यायात आला आहे . यात जे दहा अंगरक्षक आहेत त्यांची नावे आढळतात .
*संभाजी कावजी*
*जिवाजी महाले*
*काताजी इंगळे*
*कोंडाजी कंक*
*येसाजी कंक*
*कृष्णाजी गायकवाड*
*सुरजी काटे*
*विसाजी मुंरंबक*
*इब्राहीम सिध्दी*
*संभाजी करवर*
अश्या *शिवराज रक्षक* दहा महावीरांनी गर्जना करून,म्यानातून प्रचंड तलवारी उपसून पर्वतांनी जसे वाऱ्यास अडवावे तसे खानाच्या सैन्यास अडविले असा उल्लेख आढळतो .
ह्या दहा महावीराना आपआपल्या युद्ध व शस्त्र कौशल्यानुसार शञूकडील नेमुन दिलेल्या कामावर पापणीही लवता कामा नये ,जेने करून शञूस संधी मिळेल .
जीवाजी महाले यांची सैय्यद बंडावर बारीक नजर होती .हवेतल्या हवेत मारा करण्यात तरबेज ,चाणक्ष,चपळ महावीर !
खानाच्या पडल्याने शत्रूपक्षात प्रचंड गोंधळ निर्माण झाला ,ठरल्या प्रमाणे मावळे लढू लागले .चवताळून बंडा महाराजांवर वार करणा२ तोच जीवाजीने त्याचा हात हवेतच कलम केला . लाखाचा पोशिंदयाचं रक्षण झालं .
महाराजांचे प्राण वाचले .याच जीवाजीच्या पराक्रमाने महाराजांचे पुढचे २१ वर्ष स्वराज्यासाठी मिळाले .
" *होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी* " ही म्हण रूढ झाली .या महावीर योध्याची आज जयंती
सर्व शिवप्रेमीना हार्दिक
शिवशुभेच्छा
*जय जिजाऊ*
🚩🚩🚩🚩🚩🚩
*संजय खांडवे*
'दुर्ग 'या शब्दाचा मूळ अर्थच दुर्गम असलेला ,जाण्या येण्यास अत्यंत कठीण,अवघड असा हा दुर्ग असतों दुर्गाला किल्ला असेही म्हटले जाते या सर्व बाबींचे विवेचन संभाजीराजे दुर्गाविषयी देतात .तो कसा असावा ,गडाचा कुठला भाग कोठे असावा याचे शास्त्र शुद्ध विवेचन छत्रपती युवराजांच्या शास्त्रानुसार आपण पुढील भागात पाहणार आहोतच .
धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।
वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥
छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .
१)नरदुर्ग
२)वार्क्षदुर्ग
३)धन्विदुर्ग
४)अम्बु दुर्ग
५)महीदु र्ग
६)गिरि दु र्ग
असे सहा प्रकार शंभूराजे बुधभूषण या ग्रंथात द्वितिय अध्यायामध्ये सांगतात .
नरदुर्ग
हा दुर्ग म्हणजे माणसांनी वेढलेला ,शूरविरांची दुर्गम व्युहरचना केलेला,गूढ भूलभुलैय्या ,चक्रव्युव्हाप्रमाणे एकमार्गी लढवैय्यानी तटासह वेढलेला किल्ला तर्क चतुरंगसैन्याने तयार होतो
वार्क्षदुर्ग (वनदु र्ग )
घनदाट जंगलाचे सरक्षण असणारा दुर्ग ,वन ह्या दुर्गाचे सरक्षण करतो .हा गर्द झाडी मध्ये सशस्त्र सैन्याने सज्ज असा किल्ला असत्तो .
धन्विदुर्ग
हा दुर्ग म्हणजे धर्नूधारींनी सुसज्ज असा असतो .हा अनेक प्रकारच्या प्रगट -अप्रगट योध्यानी व्युहरचना केलेला असतो.
अब्दुर्ग (जलदुर्ग)
चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा दुर्गप्रकार आहे .पाण्यामधील मजबूत खडक असलेल्या बेटावर हा दुर्ग उभारला जातो.शेकडो वर्षापासून अश्या दुर्गाची प्रचंड दगडापासून बनविलेली तटबंदी या दुर्गाचीं वादळ वाऱ्यात ,प्रचंड लाटातही सरक्षण करत असतात .पिण्याच्या गोड्या पाण्यासह लागणाऱ्या इतर सर्व सोयी गडावर आढळतात .जंजीरा ,विजयदुर्ग,खांदेरी,सिधुदुर्ग ही महाराष्ट्रातील जलदुर्ग होय .जंजीरा स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांनी त्याचा बाजूलाच पदम् दुर्गाची निर्मिती केली होती .
महीदुर्ग
हा भूईकोट किल्याचा प्रकार आहे.खंदकांनी वेढलेला जमीनीवरील हा भूईकोट किल्ला असतो .बारा हात उंच बुरुज /तटबंदी त्यावर फिरण्यास प्रशस्त फांजी व तटबंदीवरील चर्या किल्ला अजिंक्य बनवतात .चाकण ,अहमदनगर ,सोलापूर येथील किल्ले भूईकोट प्रकारात येतात .
लाल किल्ला याच प्रकारात येतो .किल्याच्या चारही बाजूने खंदक खोदून त्यात सुसर मगरी सोडून त्याला अधिक दुर्गम केले जात असे .नळदुर्ग हा भूईकोट किल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे .
गिरिदुर्ग
या प्रकारात किल्याच्या चारही बाजूने पर्वत ,दरी,कातरकडा असतात .चारही बाजूने दुर्गसरक्षणार्थ तटबंदी व बुरुज असतात .
संभाजी राजे यांनी गिरिदुर्ग हा अत्यंत प्रशंसनिय मानला आहे .गिरिदूर्गाविषयी विवेचन करतांना स्वतंत्र श्लोक बुधभूषण मध्ये आला आहे.
सर्वेषामेव दुर्गाणां गिरिदुर्ग प्रशस्यते ।
दुर्ग च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम ॥
या सहा दुर्गामध्ये गिरिदु र्ग हा प्रशंसनिय व प्रशस्त मानला जातो .दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा .असे शंभूराजे म्हणतात .स्वराज्याचे तोरण तोरणागड हा गिरिदुर्ग जिकूनच बांधले गेले .स्वराज्याची पहीली राजधानी राजगड हा गिरिदुर्गच !
दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड हा सुद्धा गिरिदूर्ग प्रकारातच येतो .स्वराज्यातील बहुतेक किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात येतात .
असे सहा दुर्गप्रकाराचे विश्लेषण शंभूराजे यांनी केले आहे .महाराष्ट्राचे खरे वैभव या दुर्गातच आहे .हे शंभूनृपाने जाणले होते .
या व्यतिरिक्त दुर्गाचे त्यांच्या वैशिष्टयावरून इतर प्रकार पडतात .
मृददुर्ग
मातीपासून तयार केलेला किल्ला
अश्मदुर्ग
निव्वळ दगडापासून तयार केलेला किल्ला.
इष्टीकादुर्ग
विटा व चुन्यामध्ये बांधलेला किल्ला.
मरुदुर्ग
वाळवंटात बांधलेला किल्ला.
दारूदुर्ग व मेंढेकोट
वेळू व लाकडांनी बांधलेला किल्ला .
नृदुर्ग
हत्ती,घोडे,रथ,पायदळ असे चतुरंग सेनेचे सरक्षण असलेला किल्ला.
असे इतरही प्राचीन ग्रंथात दुर्गाविषयी नोंदी आहेत .पुढील भागात आपण शंभूराजानी दुर्गावरील प्रत्येक भागाचे महत्व व उपयोगीतेचे विवेचन केले आहे ते आपण पाहणार आहोच शिवाय गडाचे प्रत्येक भाग व त्याचे महत्व जाणून घेणार आहोत .
क्रमश:
सदर्भ
१)बुधभूषण
२)दुर्ग शोध गड किल्याचा
संजय खांडवे

माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...