सकलशास्त्रकोविद छ्त्रपती संभाजी राजे भोसले यांनी बुधभूषण या ग्रंथांच्या द्वितिय अध्यायात दुर्ग निरूपण या भागात दुर्ग प्रकार सांगितले त्याची माहीती या भागात आपण घेऊ या .
'दुर्ग 'या शब्दाचा मूळ अर्थच दुर्गम असलेला ,जाण्या येण्यास अत्यंत कठीण,अवघड असा हा दुर्ग असतों दुर्गाला किल्ला असेही म्हटले जाते या सर्व बाबींचे विवेचन संभाजीराजे दुर्गाविषयी देतात .तो कसा असावा ,गडाचा कुठला भाग कोठे असावा याचे शास्त्र शुद्ध विवेचन छत्रपती युवराजांच्या शास्त्रानुसार आपण पुढील भागात पाहणार आहोतच .
धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।
वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥
छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .
१)नरदुर्ग
२)वार्क्षदुर्ग
३)धन्विदुर्ग
४)अम्बु दुर्ग
५)महीदु र्ग
६)गिरि दु र्ग
असे सहा प्रकार शंभूराजे बुधभूषण या ग्रंथात द्वितिय अध्यायामध्ये सांगतात .
नरदुर्ग
हा दुर्ग म्हणजे माणसांनी वेढलेला ,शूरविरांची दुर्गम व्युहरचना केलेला,गूढ भूलभुलैय्या ,चक्रव्युव्हाप्रमाणे एकमार्गी लढवैय्यानी तटासह वेढलेला किल्ला तर्क चतुरंगसैन्याने तयार होतो
वार्क्षदुर्ग (वनदु र्ग )
घनदाट जंगलाचे सरक्षण असणारा दुर्ग ,वन ह्या दुर्गाचे सरक्षण करतो .हा गर्द झाडी मध्ये सशस्त्र सैन्याने सज्ज असा किल्ला असत्तो .
धन्विदुर्ग
हा दुर्ग म्हणजे धर्नूधारींनी सुसज्ज असा असतो .हा अनेक प्रकारच्या प्रगट -अप्रगट योध्यानी व्युहरचना केलेला असतो.
अब्दुर्ग (जलदुर्ग)
चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा दुर्गप्रकार आहे .पाण्यामधील मजबूत खडक असलेल्या बेटावर हा दुर्ग उभारला जातो.शेकडो वर्षापासून अश्या दुर्गाची प्रचंड दगडापासून बनविलेली तटबंदी या दुर्गाचीं वादळ वाऱ्यात ,प्रचंड लाटातही सरक्षण करत असतात .पिण्याच्या गोड्या पाण्यासह लागणाऱ्या इतर सर्व सोयी गडावर आढळतात .जंजीरा ,विजयदुर्ग,खांदेरी,सिधुदुर्ग ही महाराष्ट्रातील जलदुर्ग होय .जंजीरा स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांनी त्याचा बाजूलाच पदम् दुर्गाची निर्मिती केली होती .
महीदुर्ग
हा भूईकोट किल्याचा प्रकार आहे.खंदकांनी वेढलेला जमीनीवरील हा भूईकोट किल्ला असतो .बारा हात उंच बुरुज /तटबंदी त्यावर फिरण्यास प्रशस्त फांजी व तटबंदीवरील चर्या किल्ला अजिंक्य बनवतात .चाकण ,अहमदनगर ,सोलापूर येथील किल्ले भूईकोट प्रकारात येतात .
लाल किल्ला याच प्रकारात येतो .किल्याच्या चारही बाजूने खंदक खोदून त्यात सुसर मगरी सोडून त्याला अधिक दुर्गम केले जात असे .नळदुर्ग हा भूईकोट किल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे .
गिरिदुर्ग
या प्रकारात किल्याच्या चारही बाजूने पर्वत ,दरी,कातरकडा असतात .चारही बाजूने दुर्गसरक्षणार्थ तटबंदी व बुरुज असतात .
संभाजी राजे यांनी गिरिदुर्ग हा अत्यंत प्रशंसनिय मानला आहे .गिरिदूर्गाविषयी विवेचन करतांना स्वतंत्र श्लोक बुधभूषण मध्ये आला आहे.
सर्वेषामेव दुर्गाणां गिरिदुर्ग प्रशस्यते ।
दुर्ग च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम ॥
या सहा दुर्गामध्ये गिरिदु र्ग हा प्रशंसनिय व प्रशस्त मानला जातो .दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा .असे शंभूराजे म्हणतात .स्वराज्याचे तोरण तोरणागड हा गिरिदुर्ग जिकूनच बांधले गेले .स्वराज्याची पहीली राजधानी राजगड हा गिरिदुर्गच !
दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड हा सुद्धा गिरिदूर्ग प्रकारातच येतो .स्वराज्यातील बहुतेक किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात येतात .
असे सहा दुर्गप्रकाराचे विश्लेषण शंभूराजे यांनी केले आहे .महाराष्ट्राचे खरे वैभव या दुर्गातच आहे .हे शंभूनृपाने जाणले होते .
या व्यतिरिक्त दुर्गाचे त्यांच्या वैशिष्टयावरून इतर प्रकार पडतात .
मृददुर्ग
मातीपासून तयार केलेला किल्ला
अश्मदुर्ग
निव्वळ दगडापासून तयार केलेला किल्ला.
इष्टीकादुर्ग
विटा व चुन्यामध्ये बांधलेला किल्ला.
मरुदुर्ग
वाळवंटात बांधलेला किल्ला.
दारूदुर्ग व मेंढेकोट
वेळू व लाकडांनी बांधलेला किल्ला .
नृदुर्ग
हत्ती,घोडे,रथ,पायदळ असे चतुरंग सेनेचे सरक्षण असलेला किल्ला.
असे इतरही प्राचीन ग्रंथात दुर्गाविषयी नोंदी आहेत .पुढील भागात आपण शंभूराजानी दुर्गावरील प्रत्येक भागाचे महत्व व उपयोगीतेचे विवेचन केले आहे ते आपण पाहणार आहोच शिवाय गडाचे प्रत्येक भाग व त्याचे महत्व जाणून घेणार आहोत .
क्रमश:
सदर्भ
१)बुधभूषण
२)दुर्ग शोध गड किल्याचा
संजय खांडवे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा