शनिवार, २३ मार्च, २०२४

शिवाची १ ०८ रुपे

 



महादेव

 वीरूपाक्ष

 चंद्रार्धककृतशेखर

 अमृत 

शाश्वत

 स्थानू

 नीलकंठ

 पिनाकी 

वृषाभाक्ष

 महाज्ञेय

 पुरुष

 सर्वकामद

 कामारी

 कामदहन

 कामरूप

 कपर्दी 

विरूप

 गिरीश

 भीम

 सॄक्की (म्हणजे मोठे मोठे जबडे वाले)

 रक्तवासा

 योगी

 काल दहन

 त्रिपुरघ्न

 कपाली

 गूढव्रत 

गुप्त मंत्र 

गंभीर

 भाव गोचर 

अणिमादीगुणाधार

 त्रिलोकेश्वर्यदायक

 वीर

 वीरहंता

 घोर

 विरूप

 मासल

 पटू 

महामासाद

 उन्मत

 भैरव

 महेश्वर

 त्रैलोक्यद्रावण

लुब्ध

लुब्धक


 यज्ञसूदन

 कृतिकासुतयुक्त 

उन्मत 

कृत्तीवासा

 गजकृत्तीपरिधान

 क्षुब्द 

भुजंग भूषण

 दत्तालंब

 वेताल

 घोर 

शाकिनी पूजित

 अघोर

 घोरदैत्यग्न

 घोरघोष

 वनस्पती

 भस्मांग 

जटिल 

शुद्ध 

भेरुड शतसेवित

 भूतेश्वर 

भूतनाथ

 पंचभूताश्रित

 खग

 क्रोधित

 निष्ठूर

चंड

 चंडिश 

चंडिका प्रिय

 चंडतुंड

 गरुत्मान

निस्त्रिश

शव भोजन

 लेलिहान

 महारौद्र

 मृत्यू 

मृत्यूर गोचर

 मृत्योमृत्यु

 महासेन

 स्मशानारण्यवासी

 राग 

विराग

 रागांध

 वितराग

 शतार्ची

 सत्व

 रज 

तम 

धर्म 

अधर्म

 वासनवानुज

 सत्य 

असत्य

 सदृप 

असदृप 

अहेतुक 


अर्धनारीश्वर

 भानू 

भानुकोटीशतप्रभ 

यज्ञ 


यज्ञपती

 रुद्र

 ईशान

 वरद

 शिव

शिवाची १ ०८ रुपे

*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*

 *क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*


➖➖➖➖

आजचा पाकिस्तानचा भाग असलेला ल्यालपूर बंगा येथे 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंहाचा जन्म झाला . आई विद्यावती कौर आणि वडील किशनसिंह यांच्या संस्कारातून भगत सिंहासारख्या महापुरुषाची जडणघडण झाली . देशभक्तीचे वातावरण त्यांच्या घरातच होते त्यांच्या आजोबापासून प्रत्येक जन क्रांतिकारी चळवळीशी जुळलेले होते . यावरून लक्षात येते की भगतसिंह ज्या गोतावळयात वाढले त्यात क्रांती केवळ बोलण्याचा विषय नसून तर प्रत्यक्ष कृतीचा विषय येतो . संघर्ष , त्याग, बलिदान या गोष्टी तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी जगण्याची प्रेरणाच होती . त्यांचे काका स्वर्णसिंह आणि अजितसिंह यांच्या देशभक्तीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता .आजही भगतसिंहाचे नाव जरी उच्चारले तरी मानवतेशी जुळलेल्या चेतना ज्यांच्या हयदयात आहे त्यांची देशभक्ती आपसूकपणे जागृत होते .  देशासाठी अन मानवतेसाठी काहीतरी करावं ही भावना मनात तयार होते . भगतसिंहाचे चरित्र तरुणांसाठी एक आदर्श आहे स्वातंत्र्यासाठी आणि मानवाच्या कल्याणार्थ स्वाभिमान कसा जागृत ठेवावा आणि त्यासाठी संघर्ष कसा करावा ,याचबरोबर त्यागाचे ही सर्वोच्च प्रेरणास्थान भगतसिंह ठरतात . अगदी बालपणापासून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती किती ओत प्रत भरलेली आहे हे त्यांच्या एका प्रसंगावरून दिसून येते .एकदा मेहता आनंद किशोर हे क्रांतिकारक भगतसिंहाच्या घरी आले होते . तेव्हा चार वर्षाचा भगत लाकडी बंदुका शेतात चिखलात फिरत होता . मेहतांनी विचारले, "काय करतोस ? "तेव्हा भगतने उत्तर दिले कि, "मी बंदुका पेरतो आहे ,उद्या या झाडांना बंदुका लागतील आणि त्या घेऊन मी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावेल . " चार वर्षाच्या भगतसिंहामध्ये हा अलौकिक आत्मविश्वास कोठून निर्माण झाला ? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयापुढे आणि त्यांनी केलेल्या संस्कारापुढे आपसूकपणे आपण नतमस्तक होतो .ही त्याग अन देशाप्रती समर्पित होण्याची भावना त्या बालकाच्या मनात निर्माण होणे ही त्यांच्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या मातृभूमी प्रति असलेल्या उच्च कोटीच्या असामान्य देशभक्तीचीच प्रचीती आहे . 

         देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून स्वतंत्र करणे हा त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता . गुलामगिरीत खितपत पडणे त्यांना कदापिही मान्य नव्हते . स्वातंत्र्यासाठी ते आयुष्यात कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते .आपला देश गुलामगिरीत आहे आणि आपण स्वस्थ बसायचं हे त्यांना अजिबात मान्य नव्हते . भगतसिंह जेलमध्ये असताना देखील ते कधीच थांबले नाही त्या ठिकाणी सुद्धा वाचन ,चिंतन आणि लेखनाचा विडा त्यांनी उचलला होता .1929 मध्ये भगतसिंहांना अटक झाल्यावर ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते .त्यांना फाशीची शिक्षा झालेली असून सुद्धा ते किंचितही विचलित झाले नव्हते .  कोणत्याही प्रकारचे दुःख त्यांना जाणवत नव्हते .अलौकिक आत्मविश्वासासह अगदी निर्भीडपणे शिस्तबध्द तेने  त्यांनी आपला वेळ तुरुंगात असताना अभ्यासात ,वाचनात अन लेखणात घालविला .713 दिवसाच्या तुरुंगवासात इंग्रजी ,हिंदी ,बंगाली , उर्दू भाषेतील 302 ग्रंथ वाचून काढले .या वाचनातून आपले क्रांतिकारी विचार त्यांनी पुढे लेखनबद्ध केले .तत्कालीन परिस्थितीचा विचार करत  देशाच्या च नव्हे तर जगाच्या सुद्धा सामाजिक, राजकीय ,धार्मिक ,आर्थिक ' सांस्कृतिक विषयांची तर्कसंगत पद्धतीने विचार करून त्याची मांडणी केली . साम्राज्यवाद , सामंत शाही ,लोकशाही , भांडवलशाही या विषयावरही भाष्य केले . जगातील सर्वच महत्वाच्या राजकीय क्रांतीचा अभ्यास केला . स्वातंत्र्याच्या महानकार्यासाठी , मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानाचे महत्त्वही त्यांनी आपल्या लिखाणातून विषद करत धर्माचा ही तुलनात्मक अभ्यास करून नास्तिकतेची परिभाषा त्यांनी या बंदीवासात असताना केली आहे .या काळात त्यांनी चार ग्रंथ लिहून काढले . यामधील "Why I am an Atheist " हा लेख प्रत्येक भारतीय तरुणांनी वाचलाच पाहिजे असा आहे .भारतीय तरुणांपुढे भगतसिंहांचा आदर्श आहेच, पण फोटो पाहून आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्टेटस ठेवण्यापुरता किंवा "इन्कलाब जिंदाबाद ! " एवढंच म्हणण्यापुरता नसावा .तर भगतसिंहांनी लिहिलेले तुम्हा आम्हा सारख्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे भगतसिंहाचे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे .

         त्यांच्या जेल डायरीमधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .


*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*

 *मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*

 *परंतु ,खरंच आहे का,*

 *तुमच्यात धमक आणि  तुम्हाला स्वातंत्र्य ?*

*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*

 *तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*

 *तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*

 *मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*

*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*

 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*

 *मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*

 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*

 *खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*

 *जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*

 *अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*

 *जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*

 *त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*

 *उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*

 *त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*

 *केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*

 *त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*  


     यावरून लक्षात येते की शहीद भगतसिंह हे स्वातंत्र्य आणि गुलामगिरी याबद्दल काय म्हणत होते . सत्याच्या बाजूने उभे राहणे हे 17 व्या शतकातील महाराष्ट्रातील पहिले मराठी लोककवी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या काव्यातून सांगितले होते "सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानिअले नाही बहुमता ॥" तेच पुढे 19 व्या शतकात जेम्स रसेल आपल्या काव्यातून मांडतात व पुढे सत्याची अन सत्यासाठीची त्याग अन समर्पनाची  क्रांतिकारी धार भगतसिंह आपल्या क्रांतीतून दाखवून देतात .ते म्हणत मानवतेला प्रभावित करणाऱ्या सर्वच गोष्टीशी माझा संबंध आहे .त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही प्रतिकूल परिस्थितीत सखोल वैचारिक चिंतन घडवून एक आदर्श नव तरुणांपुढे उभा केला .आपल्या देशाचे  उज्वल भविष्य कोठे आहे हे त्यांनी जाणले होते म्हणून त्यांचे विचार हे मानवतेच्या कल्याणार्थ आजही लागू पडतात .


*तुझे जब़ह करने की खुशी मुझे मरने का शौक,*

*मेरी भी मर्जी है , जो मेरे सैय्याद की है ।*


हसत हसत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या  क्रांतिकारी वीर शहीद भगतसिंहास विनम्र अभिवादन .

➖➖➖➖➖🌷

संजय खांडवे

9011971122

शनिवार, ९ मार्च, २०२४

नमः शिवाय

 *नमः शिवाय ।*

〰️〰️〰️〰️〰️〰️


सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात .आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिव शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त शिवाची भक्ति करत असतात . यामध्ये पुरुष असो वा स्त्री  हे दोघेही तेवढीच श्रद्धा शिवशंकरावर ठे वतात .अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत .शिवलिंगाच्या रूपाने सर्वत्र शिवउपासना होते . हे  शक्तीचे प्रतीक मानले जाते . स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्याचे संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात .भगवान महादेवाच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे ब्रह्मदेव पुढे शिवांच्या प्रेरणेनेच देव, असूर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात .असे शिवपुराण सांगते .भगवान शिव शंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्या नंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावांची एक मोठी यादीच तयार होते .आदिनाथ, आदी योगी या नावाने ते प्रसिध्दच आहे .आदी हा शब्द त्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतो .गंजांतक,  जिमूतवाहन, सदाशिव , वृषभध्वज ,परमात्मा , परब्रम्ह ,श्रीनिलकंठ ,ईश्वर , शंभू  , महेश्वर , हर ,चिदानंदस्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत .निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय , चंद्रकला विभूषण, विष्णूकमल, विष्णूक्षेत्र, वेदांतवेद्य ,जटाजुटधारी, त्रिगुणातीत,भ्रमणशील, भक्तवत्सला, दयासिंधू , शंभू ,जितेंद्रिय , महेश , सृष्टीकर्ता , दुर्गेश, जगन्नाथ , मृत्युंजय , दीनबंधू ,दयासिंधू ,शर्वा, , परमतत्वमय, अविनाशी , सर्वेश्वर सहारा कर्ता, दिनबंधू ,पशुपतीनाथ,भैरव , वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्दी मुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत . ' "सर्वो वै रूद्र: " रुद्रच सर्व आहे या महा वाक्यातून ते सिध्द होते . स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखले जाते जसे सिध्देश्वर ,मानकेश्वर ,बुदनेश्वर,पाताळेश्वर ,केहाळेश्वर ,रामेश्वर अशी अनेक नावे आहेत .

   आणखी कितीतरी रुपे ही शिवाची आहे.भ्रमर कोषात शिवाची ४८ नावे आहेत .वेदांची निर्मिती होण्याअगोदर पासून शिवाची पूजा होत आली आहे .प्रागैतिहासिक काळात शिव निरंजन निराकार होते .ते स्मशानात राहत ,शरीराला भस्म लावत ,मुंडमाला धारण करत,साप अलंकार रूपाने धारण करत,ते महायोगी पेक्षाही मोठे होते.

सर्व संस्कृतीने त्यांचा स्वीकार केला होता .त्यागी -निर्लोभी-निर्लेप दैवत म्हणजे शिव होय .

        शिवाची अतिप्राचीन काळापासून उपासना केली जाते .यांचे काही मूर्तीप्रकार आहेत .

सुखासन,सोमस्कध,चंद्रशेखर,वृषारूढ,नृत्यमूर्ती,गंगाधर,त्रिपुरान्तक,कल्याणमूर्ती,अर्धनारीश्वर,भद्ममूर्ती,पाशुपत,कंकाल,हरीहर,भिक्षाटन,गणेशानुग्रह,दक्षिणमूर्ती कालारि,लिंगोद्वव,श्रीपंचाश्रीपंचाधर,ललाट तिलक ही शिवाची मूर्ती रुपे आहेत .

     उत्तर भारतात शिवाची १२ रूपांची उपासना केली जाते .

सद्योजात,वामदेव,भ्रषोर,तत्पुरुष,ईश,मृत्युजय विजय,किरणाक्ष,भदोरास्त्र,श्रीकंठ,सदाशिव,द्वादशकला संपूर्ण मूर्ती ही ती १२ रुपे आहे .आपण दक्षिण भारतात गेलो तर १८ रूपाचे पूजन होते.ही पुढील सहा रूपे त्यामधे येतात . अर्धनारीश्वर,चंदेशानुग्रह,कालाहमूर्ति,कल्याणमूर्ती,त्रिपुरान्तक,उमास्कंध .

       शिवलिंगाचेही प्राचीन काळापासून खूप महत्व आहे.नदीच्या उगमस्थानावर किंवा काठावर शिवलिंगाची स्थापणा प्राचीन काळापासून होतांना दिसते .मंदीराच्या आकाराच्या प्रमाणात शिवलिंगाची रचना केलेली दिसते .शिवलिंग मोठे असल्यास त्याची स्थापणा बाहेर ओटयावर केलेली दिसते . 

       शिलादपुत्र नंदी हा चंद्रार्थभूषणांचा अत्यंत प्रिय पार्षद होता . तो अत्यंत परमज्ञानी व विवेकपारायणी होता .नंदी हे शिवाचे प्रिय वाहन आहे .शिवमंदिरात नंदीची स्थापणा अनिवार्य असते.प्राचीन काळात विदेशातही नंदीची पूजा होत असे.मिस्त्र,बेबोलियन,

सिरिया आदि विदेशी संस्कृतीत बैल (नंदी)चे महत्व दिसते .५००० वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृती मध्ये वृषभ मूर्ती आढळलेल्या आहेत.आपण दक्षिण भारतात गेलो की नंदीच्या विशाल मूर्ती दिसुन येतात .शिवालयासमोर नंदीसाठी स्वंतत्र मंडप असल्याचा नेम दिसून येतो .महाराष्ट्रात कैलास लेणीमध्ये नंदीसाठी स्वंतत्र दालन शिवालयासमोर आहे . अगदी तसेच सुंदर असे नंदीमंडप  गडचिरोली मधील मार्कडेश्वराच्या मंदिरा समोर स्थित आहे . यज्ञ प्रसंगी  दक्षाच्या शिवविरोधाला नंदिने परखडपणे प्रति उत्तर दिल्याचे शिव पुराण सांगते .

         शिव हा एक विचार प्रवाहच आहे गत पाच हजार वर्षापासून चालत आलेला दिसतो .शिव हे कृषीसंस्कृतीचे एक प्रेरणादायी स्वरूप आहे त्यांना पशुपतीनाथही याच अर्थाने म्हटले जाते .हिमवान व मेना यांची पुत्री उमा व शिव यांच्या शिवविवाहात असंख्य कोटी गण , देवी , देवता व ऋषी मुनीच्या उपस्थितीत गंगा , यमुना , गोदावरी तथा असंख्य नद्यांच्या सानिध्यात विवाह पार पडत असतांना ध्वज ,पताके , आंबे केळी आदि खांबाचे मनोरे उभारून मंडप टाकला जातो . सप्तमातृ कांची उपस्थिती व गर्गाने उमा पार्वतीची तांदुळाने ओटी भरणे . अक्षदा, कुश व जलाने शिवाची ओवाळणी हे शिवविवाहाचे प्रसंग कृषी परंपरेचे नाते सांगतात व आजही ते आपण आपल्या शुभ कार्यात जपतो .

           शिवाचे तांडव हे या विश्वाचा नाश नाही तर संचलणार्थ आहे ,ज्याने निर्मिले तो नाश कसा करेल ?

शिवाने 'सत्य' ह्यासाठी व विश्वाच्या संचलणार्थ असंख्य निवाडे पुराणात आढळतात

महादेवास भोळा सांभ ही म्हटले जाते म्हणजे महादेव हे अगदी सहजतेने म्हटल्यापेक्षा कोणताही भेदभाव न पाळता सदैव मदतीस तत्पर अशी देवता !

       अन्न,वस्त्र,निवारा ह्या मनुष्याच्या मूलभूत गरजा या गरजे व्यतिरिक्त मिळवणे म्हणजे मोह ,वासना,आसक्ती 

आणि मनुष्य प्राण्याने मूलभूत गरजा व्यक्तीरिक्त जे धन आहे त्यापैकी काही ज्याचा मूलभूत गरजा अपूर्ण आहेत त्यांना दान करावे असे सांगत धनसंचय करणाऱ्या कुबेरासही महादेवांनी फटकारले होते हे माझ्या वाचनात आहे.

        समुद्रमंथनातील विष सृष्टीच्या संचलणार्थ आपल्या कंठात सामावणारे संपुर्ण विश्वाच्या न्यायनिवाड्यात ही केवळ आणि केवळ सत्य ह्या विषयावर ठाम राहूण पुराणामध्ये न्याय देतांना दिसतात

      न्याय दर्शनाचा विचार सांगत पुढील येणाऱ्या काळात सत्याच्या चिकित्सेसाठी गौतम ॠषींना सहा दर्शना पैकी "न्याय" दर्शनाची मांडणी करायला सांगतात

     शिवाची अनंत रुपे हया विश्वाच्या अनंत हर्षासाठी आजही तुमच्या आमच्यात जेथे सत्य आहे

जेथे पविञता आहे

जेथे विचाराची सुंदरता आहे

जेथें मनुष्यजातीची सेवा आहे

जेथे मोह,माया,लोभ,आसक्तीला

स्थान नाही 

तेथे निश्चितच देवादीदेव शिवाचाच वास आहे

➖➖➖➖➖➖

नमः शिवाय




संजय खांडवे

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...