मध्ययुगीन भारताच्या इतिहासात बऱ्हाणपूर हे शहर अत्यंत महत्वाचे होते या काळात या शहरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या अगदी मुघल बादशहा अकबर,जहागिर,शहाजहान या भागात बराच काळ होते औरंगजेब तर बरेच वर्ष या भागात राहीला.मराठयांचा इतिहासही या भागाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही .एका दिवसाचा परतीचा दौरा म्हणून नेहमी प्रमाणे अचानक महाशिवरात्र सुटी म्हणून आशीरगडाच्या भेटीसाठी म्हणून आदल्या रात्री आमचे सुरेश देवकर सर,गजानन राऊत,सर व सुशिल पनाड सरांचे नियोजन झाले . सकाळी ७ वाजता निघून १० वाजता बुलढाण्यावरुन बऱ्हानपूर पोहचलो तेथे सुरेश देवकर सरांचे मित्र बऱ्हानपूर मधील प्रसिद्ध वकिल अँड कलिम खान साहेब अामची वाटच पाहत होते त्यांच्याकडूनच सर्व शहराची माहीती आम्हाला दिवसभरात झाली मोहीम अाशीरगडाची होती पण दिवसभरात बऱ्हानपूरचा काना कोपरा फिरलो वकील साहेबांच्या आदर तिथ्यासह सर्व ऐतिहासिक माहीती मिळाली पर्यटनातून ज्या ठिकाणी जाताही आले नसते ती ठिकाणे त्यांनी दाखविली त्यावर प्रत्येक वास्तु नुसार सचित्र आपण माझ्या ब्लॉग वर पाहत आहातच !
आपण आता पाहू या कुण्डी भंडारा / खुनी भंडारा विषयी ..।
बऱ्हानपूर हे शहर त्या काळचे महत्वाचे व्यापारी केद्र होते .सुरत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा मानला जायचा .बरा२,जोधपूर,आग्रा,हैद्राबाद,औरंगाबाद ही महत्वाची शहरे व्यापारी दृष्टया बऱ्हानपूरशी जोडली गेली होती या बहुतेक महामार्गावर दुतर्फा झाडे जागोजागी विहीरी खोदलेल्या दिसतात .बऱ्हानपूर -सूरत बंदरातून टर्की,पोलंड,मास्को या देशात मलमलचा व्यापार चालत असे .जहागिर बादशहाच्या काळात बऱ्हाणपूर येथे टॉमस रो या इंग्रज व्यापाऱ्याला कपड्याच्या कारखाण्याची परवानगी देण्यात आली होती .
अश्या शहरात व्यापार व प्रशासनच्या दृष्टीकोनातून ताप्ती नदीच्या काठावर शाही महल सारख्या अनेक इमारतीचे निर्माण झालेल दिसते .
कोणत्याही मोठया शहराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पाण्याची व्यवस्था ही पाण्याची व्यवस्था जागतीक स्तरावर विचार करायला लावणारी आहे .
मुगल शासक अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी असलेले अब्दुल रहीम खान खाना याने जहागिर बादशहाच्या काळात १६ १५ मध्ये या शहरासाठी अदभूत अश्या योजनेच्या माध्यमातून " कुण्डी भंडारा " निर्माण केले .
रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून
पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।
४०० वर्षापूर्वी या भव्य दिव्य योजनेच्या निर्माण कर्त्याचे वरील काव्य आहे.पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.
सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या या कुंडी विशिष्ट अंतरावर ठेवत या कुंडीतून विहीरी प्रमाणे पाणी काढण्याची सोय केली हे पाणी शेती ,बाग,महल,सामान्य लोकासाठी उपलब्ध झाले .तयार करण्यात आलेल्या कुंडीत उतरुन साफसफाई करता येते .मागील काळात या योजने कडे दुर्लक्ष होते त्यात घाण व इतर बऱ्याच समस्या होत्या पण आता प्रशासनाने याची साफसफाई करून पर्यटनासाठी खुले केले आहे त्यातून परीसरातील गावाला पाणी पुरवठा होत आहे .पाणी अतिक्षय गोड व थंड आहे प्रशासनाने ८० फुट खोल नहर मध्ये उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केली अाहे.
कुण्डीत पाणी एका मुख्य हॉल सारख्या भागात जमा होते त्याचा धो धो आवाज अगदी स्पष्टपणे येतो. वायु दाबाच्या प्रणालीवर ही योजना आजही सुरू आहे .पूर्वी बऱ्हापूरात हे पाणी पोहचत होते पण आता काही भागात हे पाणी जाते कारण मधे बऱ्याच विहीरी व बोअर यामुळे याला फटका बसलेला दिसतो .
सोबत या पाण्याच्या योजनेचा नकाशा दिला आहे की कशा पद्धतीने हे पाणी शहराच्या विविध भागात जायचे .यामध्ये सूखा भंडारा,मूल भंडारा,चिलाहरण भंडारा,कुंडी भंडारा हे भाग आहेत .याच कुंण्डी भंडाराला खूनी भंडारा सुद्धा म्हटलं जात याचं कारण पूर्वी त्या कुण्डीत खून झाले होते म्हणून स्थानिक त्याला खूनी भंडारा म्हणू लागले.
अशी विस्मयकारी स्थळ प्रत्यक्ष पाहींली की एक वेगळी उर्जा शरीरात संचारते व मन पुढच्या मोहीमेकडे वळते .
पुढच्या भागात आपण माहीती पाहू या अगबराच्याही अगोदरच्या काळात बांधल्या गेलेल्या व आजही सुस्थितीत असलेल्या प्रसिध्द शाही जामा मज्जीत विषयी..............
संजय खांडवे
9011971122








छान
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीत सर 👌👌👍👍
उत्तर द्याहटवा