रविवार, ३१ मे, २०२०

माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहीले तर आमचीही तलवार चालेल . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर


आदर्श ,तत्वशिल ,लोकाभिमुख राज्यकर्त्या

 
गौतमीबाई व मल्हाररावासारखे सासू सासरे नव्हे तर माता -पिताची माया देणारी महान व्यक्तीमत्व होळकर कुलप्रभेला लाभली .रयतेच्या सुख दुःखात रममाण होणारी ही माणसे शेवटपर्यन्त झटत राहीली. अहील्यादेवीनी आपल्या उभ्या अायुष्यात असंख्य संकटांना सामोरे जावे लागले .१७५४ मध्ये पती सूरजमल जाटासोबत लढाईत मारल्या गेले .पती सोबत त्याच्या नऊ पत्नी सती जात असतांना सती जाण्यासाठी अहिल्यादेवींचेही मळवट भरल्या गेले पण पित्यासमान माया ओतणाऱ्या मल्हाररावांनी रयतेसाठी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून थांबविले .पति बरोबर सती न जाता त्या काळातील व्यवस्थेला या रणरागिनीने लाथाडले व रयतेच्या कल्याणार्थ हातात तलवार घेतली .
       डोळ्यादेखत नऊ सवती सती गेल्या .मालेराव अवघ्या २२ व्या वर्षी मृत्यु पावले त्यांच्या पती सती गेल्या . नातसुना देखील त्यांच्या समक्ष सती गेल्या .जावाई यशवंतराव फणसेही कॉलराने गेले , मुलगी मुक्ता व तिच्या दोन सवतीही सती गेल्या येवढे दुःख या लोकमातेने पचवले .रयतेच्या सुखात मातेला सुख मिळतं असे हा मराठयांच्या इतिहासातील वारसा राजमातेने अगदी सक्षमपणे चालविला .
    शिल्प,कला,साहित्य या क्षेत्रातील काम त्या काळात भरभराटीस आणले.धर्मशाळा,अन्नछत्रे,विहीरी,तळे,कुंडे,रस्ते व धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार ही लोककल्याणकारी कामें या काळात पूर्णत्वास आणली शिंवरायांचे स्वराज्याकार्य पुढे चालु ठेवले . राज्यकारभारात धैर्य ,बुध्दीमता,चाणाक्षपणा व निर्भिडतेने अहिल्यादेवींनी वचक निर्माण केला .ज्या महलात त्या राहत त्या ठीकाणी कोणतीही सजावट नाही बडेजावपणा नाही ,थाट माट नांही ,राजमहल वाटावा असा खर्च त्यांनी कधीच केला नाही अगदी साधेपणाने प्रखरबाणा ठेवत त्यांनी राज्य चालविले .त्या स्वतःला रयतेची सेवा करणाऱ्या ईश्वराच्या सेवक समजत असत .
    त्यांनी आपल्या पूर्वजांच्या वारश्याचा त्यांच्या विचारांचा जाणिवपूर्वक व अखंड सावधानतेने सांभाळ केला याची प्रचीती त्यांच्या एका पत्रावरून येते ,त्यांचे राज्य घेण्यासाठी सैन्य घेऊन निघालेल्या रघुनाथपंतास त्या लिहतात ," आमच्या पूर्वजांनी कुणाची खुशमस्करी करुन हे राज्य कमाविले नाही तर रक्ताचे पाणी केले आहे मी एक अबला असहाय्य स्त्री आहे अशा भ्रमात कुणीही राहू नये .मी खांदयावर भाले घेंऊन समोर उभी राहीली तर,सगळे मनसूबे जागच्या जागी विरतील ,माझ्या राज्याकडे कुणी डोळा वर करुन पाहिले तर आमचीही तलवार चालेल.आपण माझे राज्य हिरवून घेण्याचे कपट रचून आलात ,आमच्याकडील फितुरास गाठले ,मला दुबळी समजलात की खुळी ? दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे हा दृष्ट हेतू .आता आपली गाठ रणांगनातच पडेल .मी हरले तर किर्ती करून जाईल ,पण आपण स्त्रियाकडून हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही .अहिल्याबाईना तिच्या राज्या सह गट्ट करता येईल या भ्रमात न रहावे,त्यातच आपले हीत अाहे."
         अशी युद्धनिती वापरून व पाहिल्यांदाच महीलांच्या हातात शस्त्र देवून त्यांचे सैन्यदल तयार करुन रघुनाथपंतास उत्तर दिले. लोकमाता,राजमाता,रयतवत्सल पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !



                 संजय खांडवे
                9011971122

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...