रविवार, १५ मार्च, २०२०

समाजातील अंधश्रद्धा व संतांचे विचार


समाजातील अंधश्रद्धा व संतांचे विचार
〰〰〰〰〰〰〰
समाजाच्या   विकासातील एक प्रमुख अडथळा म्हणजे समाजात पसरलेली अंधश्रद्धा, श्रद्धा असावी पण  ती आंधळी नसावी पण आपल्याला अंधश्रद्धेने प्रचंड प्रमाणात बंदिस्त केलेले दिसते बरेचसे विकासाचे मार्ग हे या अडथळ्यांमुळे ध्येयापर्यंत उशिरा पोचवतात अन आपला माणूस मागे पडतो
आजच्या काळात यशस्वी समजतात जो आर्थिक दृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मजबूत आहे मग तो इतर क्षेत्रात आपोआपच  समोर जाताना दिसतो पण दोन्हीसाठी तो मानसिक दृष्ट्या निरोगी असेल,त्याची वैचारीक बैठक मानवीमूल्य जपणारी असेल तर त्याला यशाचे अधिक अगं सापडतात त्याच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात तो संकुचित राहत नाही आणि तो समाजाकडे  सकारात्मक दृष्टीने  बघायला लागतो,यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तो सरसावतो,
आपला इतिहास सांगतो की स्वराज्य स्थापनेसाठी जिजाऊंनी पुणे वसविले व त्या ठिकाणची फुटकी  कवटी चप्पल  व पहार शिवरायांच्या हाताने उध्वस्त करुन त्याठिकाणी बाल शिवबाच्या हाताने सोन्याचा नागर चालविला ती भूमी कसायला मुक्त केली व त्याठिकाणी वस्ती करून पुणे शहर वसविले आणि खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेला मुठ माती देण्याचं काम जिजाऊंनी व शिवबा यांनी मिळून केले शहाजीराजांनी  पूर्वी पासून कल्पिलेल्या स्वप्नाला  उभारी मिळाली. समाज ,रयत भयमुक्त करण्याचे पहिले काम आऊसाहेबांनी शिवबांना सोबत घेऊन केले ,नाहीतर आज रस्त्याने साधा लिंबू दिसला तर आई लेकराला बाजूने घेऊन जाते या मानसिकतेतील तुम्ही आणि आम्ही आहोत.

आपल्या समाजात सुरु असलेल्या रूढी व परंपरा या फार या जुन्या आहेत बहुतेक परंपरा आपली  स्मृति जपणाऱ्या आहेत संस्कृती जपणाऱ्या आहे पण कालानुरूप काही रूढी घुसविलेल्या किंवा प्रवाहानुसार आलेल्या दिसतात.त्याची चिकित्सा करून त्या बाजूला करणे अत्यंत महत्वाचे वाटते,मुळात आपली संत परंपरा हेच सांगते,बाराव्या शतकापासून नामदेव -ज्ञानदेव -तुकाेबांच्या भागवत धर्माची पताका ही जनमानसात सामान्याची प्रबोधनाची दिशा दाखविणारी ठरली .
         समाजाला खऱ्या अर्थाने या संत विचारांचा आधार घेऊनच समाजात विकासात्मक व सकारात्मक परिवर्तन होणे शक्य आहे .समाजातील अंधश्रध्देवर याच विचारांनी प्रहार केले ,शोषणमुक्त समाजासाठी हीच संतपरंपरा झटती मध्ययुगीन काळात भारतातील जुलमी शासनकाळात ह्याच संतपरंपरेने स्वातंत्र्यांची ज्योत जीवाची पर्वा न करता तेवत ठेवली .
         जनमानसात ,घराघरापर्यन्त पोहचलेले अन मुखोतगत झालेले तुकाेबांचे अभंग हाच समाज परिवर्तनासाठी सर्वात सोपा मार्ग वाटतो,प्रत्येक घरात तुकाेबांची गाथा असणे अत्यंत आवश्यक वाटते,तुकोबांची शब्दरत्ने ही खूप महत्वाची मानवी मूल्ये ,नैतिकमूल्ये जपणारी आहेत ,अगदी जन्मापासून मृत्युपर्यन्त जीवनातील प्रत्येक पैलूवर अगदी निर्भिड भाष्य आढळते .
        *आजच्या काळात माणूस परिर्वतन आपल्या सोईने स्वीकारतो व घोळ होतो,सुईच न घेता सोईच स्वीकारतो* आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण आपल्या मूळच्या आदर्शोंना विसरतो,वास्तवतेला विसरुन कल्पना विलासातील बाबी खऱ्या मानायला लागतो मग श्रद्धा-अंधश्रध्देचा घोळ होतो . मानवी स्वभावच असा आहे की तो अदभूत,विलक्षण,चमत्कारीकबाबीकडे वास्तविक गोष्टीपेक्षा अधिक आकर्षित होतो व त्याच्या कुतुहलाच्या कल्पनाविलासात गुंग होतो .तुकाेबांचा गाथेत वास्तविकता आहे ती समाजाभिमूख ,विज्ञानवादी मन मनाला भिडणारी आहे .
      जगतगुरू तुकोबांचे सपूर्ण चरित्र हे प्रेरणादायी आहे
*कासाया एकांत सेवू वाडा ।*
*आनंद तो जनमाचि असे ॥*
  मी जंगलात एकटा राहून काय करू ,मला खरा आनंद या समाजात राहण्याचा आहे व मी त्यासाठी झिजेल हे तुकोबांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकुटुंबासह पर्यायाने समाजालाही तारणारे आहेत . जगण्याचा समाजाभिमूख मंत्र तुकाेबांनी आपल्या गाथेतून दिला आहे .स्वतःच्या संसाराबरोबर समाजाचाही संसारासाठी तुकोबांनी आपल्या आयुष्याची ४२ वर्ष घालविली .गाथेतीत प्रत्येक अभंग प्रेरणादायी आहे समाजातील अंधश्रद्धा घालवायची असेल ,भयमुक्त समाजव्ययस्था बघायची असेल तर तुकोबांचे प्रत्येक अभंग संदर्भ ,आशय व विवेचनासह तरूणापर्यन्त घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यन्त पोहचने  व कुटुंबात सामुहीक बसून त्यावर चर्चा करने गरजेचे वाटते .
*आता आम्हा भय बा कुणाचे ।*
*बळ विठोबाचे आले ऐसे ॥*
अश्या पध्दतीने तुकाेबांनी जनमानसात विठोबा पाठीराखा करून सामान्याना अध्यात्मिक बळ देण्याचे काम केलेले दिसते.
         *तुका म्हणे माना मान ।*
*हे बंधन नसावे॥*
     मान अपमानाचे बंधन नसावे ,हे घातक आहे यामुळे समाजातील नाती तुटतात .समाजात मान -पानाच्या असंख्य प्रथा आहेत यातूनच आपण दुरावत जातो ,संकुचित होतो हा ४०० वर्षापूर्वीचा संदेश आज समाजात जाणे गरजेचे वाटते.
   असे हजारो अभंग आहेत की जे प्रेरणादायी व जीवन सफल करणारे आहेत याचे प्रवचन नाही तर घरा-घरात चिंतन होणे गरजेचे आहे .
कुंटुंबस्तरावर एक संस्काराचा भाग म्हणून तुकाेबांची गाथा महत्वाची  आहे .
तुर्तांच येवढेच ........!
तुकोबांचे अभंगांचे विवेचन पुढे असेच सुरु ठेवू या !



संजय खांडवे
बुलढाणा
९०११९७११२२

३ टिप्पण्या:

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...