गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

प्रकांड पंडीत कृष्णराव अर्जुनराव केळूसकर गुरुजी

 


धर्मशास्त्र,अर्थशास्त्र,शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र,तत्वज्ञान,इतिहास हया विषयावर आपल्या साहित्यातून विस्तृत स्वरूपात लिखान करनारे प्रकांड पंडीत ,बहुजनसमाजाचे वाड़मयमहर्षोंच ज्यांना म्हणता येईल असे कृष्णराव अर्जुन केळूसकर यांचा साहित्य विश्वातील कार्य पाहता नतमस्तक व्हावे असेच आहे .
        आज त्यांचा जन्मदिवस एक आठवण म्हणून का होईना वाचून जे काही लिहावसं वाटलं ते मांडतोय !
    गीताशास्त्राचे वास्तविक रहस्य सामान्य लोकांना उत्तम रितीने अवगत व्हावे ,गीतेतील प्रत्येक श्लोकाचा अन्वय व त्यातील प्रत्येक पदाचा अर्थ वाचकास कळावा या उद्देशाने त्यांनी सान्वय,सार्थ,सटीक गीतेवरील भाष्य केले आहे .८९० पानाचा हा श्लोकासह विधिध अंगानी टिपनी सह हा महाग्रंथ मांडला आहे .विदवानापासून विदयार्थापर्यन्त आवडेल अश्या ग्रंथाची रचना केली .
        संत तुकाराम,गौतमबुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषांचे चरित्र सर्वप्रथम मराठीतून लोकासमोर मांडले .
पुढे हेच गुरुजींचे बुद्धचरीत्र बाबासाहेंबांच्या जीवनातील प्रेरणादायी भाग ठरुन ऐतिहासिक क्रांती घडवून गेले .
१८९६ साली  पद्य स्वरुपातील तुकोबांचे र्चारत्र जगासमोर मांडले.
        तात्कालिन उपलब्ध इतिहास साधनांचा अभ्यास करून १९०६ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे  विस्तृत स्वरूपात ,क्रमवांर घटनासह अभ्यासपूर्ण असे चरित्र लिहून काढले .
     या ग्रंथासाठी श्री छत्रपती शाहू महाराज सरकार ,श्रीमत महाराज बापूसाहेब कागलकर,श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड या ग्रंथासाठी उदार आश्रय दिला .इंदूरचे श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांनी या शिवचरित्राच्या ४००० प्रति खरेदी करुन जगभरातील ग्रंथालयाला वाटप केल्या .शिवराय जगाच्या कान्याकोपऱ्यात पोहचविले .१९२० साली या ग्रंथाची दुसरी आवृती प्रकाशित झाली .
         या महान कार्याला मानाचा मुजरा !
   आपण नककीच हया दुर्मिळ,अभ्यासपूर्ण साहित्याचा लाभ घेऊन महान युगपुरूषांची चरित्र जाणून घ्यावी ही अपेक्षा .

जय जिजाऊ

संजय खांडवे

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे

जागतिक आदिवासी दिवस










आज जागतीक आदिवासी दिवस
विश्वाची निर्मिती कशी झाली ,माणूस कसा तयार झाला याबाबत असंख्य संशोधने आहेत ,संकल्पपणा आहेत पण या पृथ्वीवरील पहिला मानवी वंश विकसित होत समुहाने राहू लागला तो म्हणजे आदिवासी !
 मातृभूमीत आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेला समाज !
महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेल्या भव्यदिव्य अश्या सहयाद्रीमध्ये  पदभ्रमंती करत असतांना नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ,नेम राजुर परिसरात तीन दिवस भ्रमंती करतांना आदिवासी समाजातील क्रांतीकारी क्रांतीवीरांचा अपरिचित इतिहास प्रथमच स्थानिक व इतर संदर्भतून कळाला .पराक्रमी व वैभवशाली इतिहासापासून आपण अनभिज्ञ राहिलो याची जाणिव मात्र नककीच झाली .
    आदयक्रांतीवीर राघोजी भांगेरे यांची मातृभूमी म्हणजे हा परिसर ,कळसूबाई परिसरातील देवगाव हे त्यांचे जन्मगाव .
रमाबाई व रामजी यांच्या पोटी राघोजीचा जन्म झाला ,बालपणापासूनच विविध शस्त्र चालविण्यात त्यांना त्यांच्या वडीलांनी पारंगत केले होते .त्या परिसरातील डोंगरदऱ्या, गड कोट,कातरकडा,वाटा,पडवाटा ,गुफा आदि राघोजीनी बालपणीच पिंजून काढल्या होत्या .
    क्रांतीकारी विचारांची बीजे आपल्या मनात घेत ,स्वराज्याचा विचार म्हणजे स्वाभीमान बाळगणारा हा मावळा आपल्या मातृभूमी व माणसे यांच्या रक्षणार्थ सज्ज झाला होता .उंचपुरे पिळदार शरीर ,धारदार डोळे ,शञूला पाहूनच धडकी भरायला लावणारे होते ,नुसत्या नावाने थरकाप उडायचा असे व्यक्तीमत्व !
       "इंग्रजांचा येथे अधिकार नाही ,ही मावळी मायभूमी आहे आमची तिच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे " 
पारतंत्र्याच्या जोखंडाला उलटविणारा हा क्रांतीकारक होता . जीवाला जीव देणारे साथीदार म्हणजे घेवाजी आव्हाळ,बाळा ठाकूर,धर्मा मुंडा,राया ठाकर,शिवा न्हावी,जाणकु धौंडगा,अंतोबा लाटे ,खंडू साबा,देवाजी नाना अशी कितीतरी क्रांतीकारकांची नावे स्थानिक पटा पटा सांगत होती .
    रतनगडावर राघोजीने पहिले बंड केले .जुलमी सरकार व सावकाराविरोधात राघोजी व त्यांच्या साथीदारांनी पहीले बंड केले .राघोजी कुणावरही अन्याय होऊ नये या मताचा होता .स्त्रियाबद्दल त्याच्या मनात अत्यंत आदराची भावना होती .त्या परिसरात राघोजीचे शौर्य व कार्य दुमदमू लागले .

राघोजीने केला बंड
बागडीच्या पाण्यापाशी !

हे गाणे गुणगुणले जाते .बागडीची माची त्या परिसरात प्रसिद्ध आहे .उंच अश्या भव्य डोंगरावर हा सपाट भाग ,या ठीकाणी गुरे चरायला असतात .त्या ठिकानी असलेल्या गुहामध्ये राघोजी व त्यांच्या सहकार्याचे वास्तव्य होते .इंग्रजाना अश्या ठिकाणी पोहचणे फार कठिण ! ही जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांनी काही काळ निवडली .त्या माथ्यावर वर्षभर पिण्याचे पाणी त्या बागडीत असते .बागडी म्हणजे भांडे ,भाडयासारखा तो पाणी साठविण्याचा भाग  त्या माचीवर आहे .याच ठिकाणाहून त्यांनी इंग्रजाविरूद्ध,जुलमी सावकाराविरूद्ध  बंड पुकारले .
     त्यांचा तळकोकणातील प्रसंग,गौरीपुरी येथील इंग्रजांच्या छावणी वरील हल्ला ,नाशीक हवेली वरील आदी प्रसंग स्थानिक सांगतात .सामान्याच्या न्याय हककासाठीचे हे कार्य दिसून येते .
     त्यांचा बुधा नावाचा साथीदार इंग्रजांनी पकडले होते ,रघुजीचा पत्ता सांग त्यांना पकडून दया यासाठी पाच हजार देऊ केले .नाहीतर गोळया खा अशी धमकी दिली .जीवाचा जीवलग इंग्रजांना उंच टेकडी कडयावर घेऊन गेला व वरुन शेकडो फुट दरीत उडी मारून मृत्यु पत्कारला पण दगाबाजी केली नाही .या मातीला राघोजीची गरज आहे याचे भान या बुधाजीला होते .अशी माणसे तयार केली राघोजीने .
   सातऱ्याचे प्रतापसिहराजे भोसले यांनी राघोजीचे कार्य बघून त्यांना सातऱ्याला आमत्रित केले .त्यांना शस्त्र सैन्य आदीची मदतही केली होती त्यांचा आदर सत्कारही केला होता.
     १८४५ साली जुन्नर येथे इंग्रजाविरूद्ध  उठाव केला यात मुंबई प्रांतापासून इंग्रजांनी दखल घेत १०००० सैन्य तोफगोळयासह राघोजी व त्यांच्या सहकार्या विरोधात उभे केले .मैदानी भागात आल्याने त्यांचे असंख्य साथीदार मातीसाठी कामी आले .हतबल होऊन राघोजीनी त्या ठिकाणाहून आपली सुटका केली .पुढे गोसाव्याच्या वेषात भूमीगत राहून आपले कार्य सुरू ठेवले .इंग्रज त्यांच्या मागावर सुरुच होते .त्या भागातील अनेक गडाच्या पायऱ्या इंग्रजांनी ब्लास्टीग करून उडविल्याच्या खुणा आहेत .आजही अंनंद,मदन,कुलंग यासारख्या गडावर सामान्य माणूस सहज जाऊचं शकत नाही .
        ह्माच स्वातंत्र्यंच्या लढाईत ,भूमीगत असतांना इंग्रजांनी पढ़रपूर येथे राघोजीना कैद केले .एकतर्फि निर्णय देत त्यांना फाशी सुनवली .२ मे १८४८ ला आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे या मातीसाठी शहीद झाले .

आज ऑगष्ट् क्रांती दिवस ,भारतीय स्वातंत्र्य लढयाचे रनशींग फुकले गेले या लढयात कामी आलेल्या हुतात्माना नतमस्तक होण्याचा दिवस !
   तसाच जागतिक आदिवासी दिवसह आजचं !
आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे सारखे त्यांच्यासोबत लढणारे असंख्य आदिवासी बांधव या मातीच्या प्रेमापोटी आपला स्वाभिमान जपत अमर झाले ,त्यांच्या कार्यासही सलाम !

संजय खांडवे
बुलढाणा



प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...