हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य या परिवाराचा सदस्य म्हणून आदरनिय श्री शिवरत्न शेटये सर यांच्या मार्गदर्शनात
वर्षातून दोन मोहीम आम्हाला करायला मिळतात त्यापैकि पन्हाळगड ते पावनखिंड ही एक मोहीम होय .
शिवप्रतापभूमी मध्ये अफजली संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की आमची माती अन माणसं याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो .या विजयानंतर महाराज दुसऱ्याच दिवशी मोहिमेंवर निघाले पुन्हा विजयी घोडदौड सुरु झाली एकाच महिन्यात महाराजांनी पन्हाळा स्वराज्यात घेऊन कोल्हापूर प्रांतावर आपला वचक बसवला .या भागात बरेच किल्ले बिनहरक़त मिळाले.मात्र रांगणा खेळणा छापे घालून घ्यावे लागले .खेळणा किल्ला घेण्यास बरेच प्रयास झाले म्हणून याचे नाव विशालगड पडले .
गडाचे बांधकाम अत्यंत प्राचीन आहे ११/१२ व्या शतकात हा रांगडा किल्ला बांधला गेला असावा .शिलहार राजा भोज याची ही राजधानी होती .पुढे यादव ,बहामनी,विजापूरकर,मराठे,मोगल यांचे अधिपत्य या गडावर होते .

महाराज राजदिंडी दरवाजामधून गडउतार झाले.याच वाटेतून त्या रात्री पावसात निवडक बांदल मावळे व सरदारासह आशाड शुद्ध पौर्णिमेंला दोन पालख्या निघाल्या.तरबेज भोयासह स्वराज्याचे छत्रपती व विर शिवा काशिंदांना आपल्या मजबूत खांद्यावर पेलून पुढे गुढगाभर चिखल ,नदया ,नाले पार करत ही स्वराज्यनिष्ठ मावळे निघाले होते .
या बंदिस्त विहिरीचा वापर सैनिकांना पाणी पिण्यासाठी असे .शञूने यात विष कालवू
नये म्हणूण बंदिस्त आहे तीच ही अंधा२ बावडी
नये म्हणूण बंदिस्त आहे तीच ही अंधा२ बावडी
अवघ्या दोन चार महिण्याअगोदरची भेट पण शिवरायांवर जिवापाड
प्रेम करणारी मावळे याच मातीत जन्मले .स्वराज्यावरील अगाध विश्वास ,या
मातीतील प्रत्येक मावळ्याचा स्वाभिमान जागृत करत प्रसंगी अन्यायाविरूध्द
लढतांना प्राणही देण्यास धजंत नसे .
"लाख शिवा काशिद गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे "
ह्या प्रेरनेने वीर शिवा काशिदांनी आपला मृत्यु समोर दिसत असतांनाही स्मामीनिष्ठता जपत स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले .
सोंगातल्या शिवाजीचीही पाठ जिंवंतपणे सिध्दी पाहू शकला नाही तर खऱ्या शिवाजी महाराजांची तर दूरच ....
शिवाजी महाराज होऊन मरायलाही भाग्यच लांगतं .....
आज वीर शिवा काशिंदांचे बलिदान म्हणजे स्वराज्याचा एक खांबच आहे
मातीसाठी कामी आलेल्या वीरांच्या चरणी हा देह सदैव नतमस्तक राहील
कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ मोहीमेत खंड.
दरवर्षी हिंदवी परिवार ,महाराष्ट्राच्या वतीने जुलै महिन्यात पन्हाळगड
ते पावनखिंड या पायदळ मोहीमेचे आयोजन करण्यात येत असते.या मोहीमेत संपुर्ण
महाराष्ट्रातून ८०० स्री पुरूष मावळे सामील होत असतात. मी गेल्या ५
वर्षापुर्वी बुलडाणा जिल्ह्यातून एकटाच या मोहीमेला जाण्यास सुरूवात केली
आहे.मागच्या वर्षी संजय खांडवे सर आणि किशोर पवार सर हे माझ्यासोबत सामील
झाले आहेत.कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर यावर्षी पन्हाळगड ते पावनखिंड
मोहीम स्थगित केली आहे.
मित्रांनो शिवरायांचा
संपुर्ण इतिहास हा आव्हाने ,संकटे ,शत्रूशी लढाई,धावपळ अशा रोमांचकारी
प्रसंगानी ओथंबून भरलेला आहे.यापैकी एखादा प्रसंग आपण अनुभवावा या हेतूने
आम्ही या मोहीमेत सामील होत असतो.शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
पन्हाळा ते पावनखिंड या मार्गाने पायदळ जावून आपणही त्या मार्गावर जीवनाचे
काही क्षण खर्च करावे हा हेतू यामागे असतो.
या
वर्षी शरीराने जरी या मोहीमेला जाता आले नाही तरी घरबसल्या मनाने आणि
विचाराने या मोहीमेचे स्मरण करून आम्ही ही मोहीम पुर्ण करणार आहोत.
दरवर्षी ११,१२,१३ जुलै असे तीन दिवस ही मोहीम राबली जाते.१० जुलैला
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावजवळील शिवसृष्टीत आम्ही सगळे
मावळे मुक्कामी जमा होतो.तेथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन
नेबापूर येथील वीर शिवा काशीद यांच्या समाधीजवळ सकाळी ८.३० वा.हजर
होतो.तेथे हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डाँ.शिवरत्न शेटे सरांचे वीर
शिवा काशीद यांच्या बलीदानावर अंगावर शहारे आणणारे व्याख्यान होते.उपस्थित
सर्व मावळे वीर शिवा काशिदच्या बलिदानाच्या इतिहाने प्रेरीत होऊन वीर शिवा
काशिदच्या नावाचा जयजयकार करून समाधीवर नतमस्तक होतात.वीर शिवा काशिदच्या
समाधिला अभिवादन करून पन्हाळा किल्याच्या पुर्व दिशेने आम्ही गड चढून वीर
शिवा काशिदच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करतो व पुढे
निघतो.
गडाच्या मध्य भागावर आल्यावर वीर बाजीप्रभू
देशपांडे यांचा पुतळा लागतो त्या पुतळ्याजवळ आल्यावर पुतळ्याला सर्वजन
अभिवादन करतात आणि तेथून पुढे गडाच्या पश्चिम दिशेकडे निघतो.
गडाच्या पश्चिमेकडे आल्यावर गड उतरण्याच्या अगोदर पुसाटी बुरूजाजवळ सर्व
मावळ्यांच्या हाताला ओळखपट्टी बांधली जाते जी पुर्ण मोहीम संपेपर्यंत
हाताला बाधून ठेवावी लागते. तेथेच पुढील मोहीमेच्या सूचना दिल्या
जातात.मोहीमेदरम्यान या सूचनांचे तंतोतंत पालन करावे लागते.जो नियम मोडतो
त्याला कायमस्वरूपी मोहीमेतून काढून टाकण्यात येते.यानंतर महाराज ज्या
मार्गाने गड उतार झाले होते त्या पायदळ वाटेने आम्ही गड उतार होतो.
गड उतार झाल्यावर तुरकवाडी हे गाव लागते तेथून थोडे पुढे गेल्यावर चढाई
लागते.चढाई चढून गेल्यावर म्हाळुंगे हे गाव लागते.म्हाळुंगे गावातून थोडे
पुढे चढून गेल्यावर मसाई पठार सुरू होते .हे पठार जवळपास १२ कि.मी.सलग
आहे.पठाराच्या सुरूवातीला माथ्यावर आम्ही सर्व मावळे सोबत आणलेला जेवनाचा
डब्बा खातो आणि पुढे निघतो.नंतर सतत चालल्यावर पठाराच्या मध्यभागी मसाई
देवीचे मंदिर आहे .तेथे थोडावेळ बसून परत पुढे चालायला लागतो.पठार
संपल्यावर पठार उतरून खाली आल्यावर कुंभारवाडी हे गाव लागते.कुंभारवाडीतून
पुढे गेल्यावर खोतवाडी हे आमच्या मुक्कामाचे ठिकाण असते.
खोतवाडी हे छोट गाव आहे.त्यामुळे त्या दिवशी प्रत्येक घरी आमच्या ८००
मावळ्यांची राहण्याची सोय केलेली असते.भोजन व्यवस्था प्राथमिक शाळेत असते व
सध्याकाळचे प्रबोधन पण तेथेच होते.अशा प्रकारे नेबापूर ते खोतवाडी असा २०
कि.मी.पायदळ प्रवास करून खोतवाडीत मुक्काम करतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व तयार होऊन शाळेत चहा व नास्त्यासाठी जमा
होतो.चहा व नास्ता झाल्यावर तेथेच दुपारचा जेवनाचा डब्बा प्रत्येकाच्या
सोबत दिला जातो.दुसऱ्या दिवशीचा प्रवास हा खडतर आणि रोमांचकारी
आहे.सुर्यप्रकाश जमीनीवर पोहचत नाही अशी दाट झाडी ,स्वच्छ पाण्याचे
खळखळणारे ओढे ,भातशेती फणसाची झाडे अशा निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या
मार्गावरून आमचा पायदळ प्रवास सुरू होतो.मार्गात मंडईवाडी
,धनगरवाडी,कळवेवाडी,रिंगेवाडी ,माळेवाडी,पाटेवाडी ,सुकामळा,म्हाळसवडे,मान
धनगरवाडी आणि शेवटी पांढरेपाणी येथे मुक्कामाला पोहचतो.
पांढरेपाणी येथे मुक्काम करून सकाळी ८.०० वा.नास्तापाणी करून ५ कि.मी
.अंतरावर असलेल्या पावनखिंडीकडे प्रवास सुरू होतो.साधारपणे सकाळी १०.००
वा.सर्व मावळे पावनखिंडीत जमा होऊन पावनखिंडीत शहीद झालेल्या ४००
मावळ्यांच्या बालिदानाचा इतिहास डाँ.शिवरत्न शेटे यांच्या ओघवत्या आणि वीर
रसाने भरलेल्या व्याख्यानाने मोहीमेची सांगता होते.४०० मावळ्याच्या
बलीदानाचा इतिहास ऐकून सर्व मावळे त्या स्थळावर नतमस्तक होऊन त्या स्थळाची
पावन माती आपल्या कपाळाला लावून जड अंतकरणाने पुढच्या वर्षी पुन्हा
येण्याच्या इराद्याने आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात.
यावर्षी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर पन्हाळगड ते पावनखिंड या पायदळ
मोहीमेत खंड पडल्यामुळे सर्व मावळे अस्वस्थ झाले आहे.त्यामुळे ही महामारी
लवकर संपून हिवाळी मोहीमेकडे सर्व आतुरतेने बघत आहेत.
*वीर
शिवा काशिद ,बाजीप्रभू ,फुलाजीप्रभू देशपांडे ,हिरडस मावळचे बांदल बंधू
आणि अनामिक ४०० मावळ्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!*
धन्यवाद !
पी.जी.सवडदकर
शिवकुंज ,शिवाजी नगर ,चिखली
ता.चिखली जि.बुलडाणा
मो.नं.9822194166





















